भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा मागील वर्षी 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून, सध्या मुंबई येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रिषभ सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात खराब काळातून जात असतानाच, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्या कानशिलात मारण्याची इच्छा असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.
रिषभच्या अपघातानंतर त्याच्यावर सुरुवातीला डेहराडून येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील केली गेली. सध्या तो मुंबईतच उपचार घेतोय. रिषभ संघात नसल्याचा काहीसा तोटा भारतीय संघाला होणार आहे. याच मुद्द्याला धरून कपिल देव यांनी एका कार्यक्रमात म्हटले,
“मला रिषभ आणि त्याचा खेळ खूप आवडतो. मात्र, सध्या माझा त्याच्यावर फक्त राग आहे. ज्यावेळी तो बरा होईल त्यावेळी मी त्याची भेट घेऊन त्याच्या कानशिलात मारेल. ही थप्पड त्याच्या निष्काजीपणासाठी असेल. मात्र, त्यानंतर पुढे त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगेल. कारण, त्याची संघाला गरज आहे. त्याच्यासारखा प्रमुख खेळाडू नसल्यास संघाला नियोजन बदलावे लागते. युवा खेळाडूंनी यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.”
पंत भरधाव वेगात गाडी चालवत असताना त्याचा हा अपघात झाला होता. त्याच्या पायाची लिगामेंट त्यामुळे तुटलेली. त्यावर शस्त्रक्रिया झाली असून, त्याला संपूर्णपणे बरे होण्यासाठी अद्याप सहा-सात महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र, त्यामुळे तो 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होत असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी, आयपीएल तसेच आशिया चषकाला देखील मुकणार आहे.
(I Want Slap Rishabh Pant Kapil Dev Controversial Statement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईट कॅमेरा ऍक्शन! कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचे फोटोशूट, नव्या जर्सीत खेळाडूंची धमाल
“अश्विनचा सामना करणे म्हणजे बुद्धिबळ खेळण्यासारखे”, नंबर वन ऑस्ट्रेलियन फलंदाजाची कबुली