क्वालिफायर- 1 (Qualifier 1) मध्ये पंजाब किंग्सचा (RCB vs PBKS) पराभव करून आरसीबी आता आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. अंतिम सामन्यांमध्ये आरसीबीने चौथ्या वेळेस त्यांची जागा पक्की केली आहे. परंतु संघाने आजपर्यंत ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संघाकडे पहिल्यांदा ट्रॉफी त्यांच्या नावावर करण्याची संधी आहे. तसेच अंतिम सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटर आर अश्विनच्या विधानाने आरसीबीच्या चाहत्यांचे थोडेसे होश उडाले आहेत. (Former cricketer R Ashwin) अश्विनच म्हणणं आहे की, आरसीबीला प्रार्थना करण्याची गरज आहे की मुंबई इंडियन्स अंतिम सामन्यात पोहोचू नये. नाहीतर त्यांच्यासाठी ट्रॉफी जिंकणे अवघड होईल.
त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, जर आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकायची असेल तर गुजरात टायटन्सला (gujrat Titans vs mumbai indians) मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय प्राप्त करावा लागेल. मुंबई असा संघ आहे, ज्या संघाला तुम्ही अंतिम सामन्यात प्रवेश नाही करून देऊ शकत. तुम्हाला त्या संघाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. मुंबई इंडियन्स एक मात्र असा संघ आहे, ज्यांच्याकडे आरसीबी विरुद्ध खूप संधी आहे. जर मी आरसीबी संघामध्ये असतो तर मला गुजरात टायटन्स विरुद्ध सामना खेळायला आवडल असता.
आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेतील पहिला सामना आज म्हणजेच 30 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध (MI vs GT) गुजरात टायटन्स संघात मुल्लांपूरच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल त्यांचा सामना क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे, कारण पंजाब किंग्सला क्वालिफायर एक मध्ये 1 विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे.
क्वालिफायर एक मध्ये आरसीबी कडून कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे पंजाब किंग्स फक्त 101 धावांवर ऑल आऊट झाली. त्यानंतर आरसीबीने हे आव्हान 2 खेळाडू गमावून 10 षटकात पूर्ण केले. आरसीबी 9 वर्षानंतर आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे.