भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना बुधवारी (17 जानेवारी) बेंगलोरमध्ये पार पडला. उभय संघांतील ही रोमांचक लढत दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने जिंकली. या विजयासह भारताने तीन सामन्यांची टी-20 मालिक 3-0 अशा अंतराने जिंकली. दोन्ही संघांतील या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले. पण जर या सामन्यातील दुसरी सुपर ओव्हर टाय झाली असती तर? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुधवारी नवा इतिहास घडला. एका टी-20 सामन्यात दोन सुवर ओव्हर खेळवले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी 2019 मध्ये वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळल्या गेल्या होत्या आणि दोन्ही सुवर ओव्हर टाय झाल्या होत्या. असात या सामन्याचा निकाल चौकारांच्या संखेवरून ठरवण्यात आला होता. असे असले तरी, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिला गेलेला हा निर्णय आजही वादाचा विषय ठरतो. या विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसीवर देखील नियमात बदल करण्यासाठी दबाव आला होता. याच पार्श्वभूमीवर आयीसीस सुपर ओव्हरच्या (Super over Rule) नियमात महत्वाचा बदल केला.
नवीन आयसीसी नियमानुसार दोन्ही संघ सामना निकाली निघेपर्यंत सुपर ओव्हर खेळू शकतात. पहिल्या सुवर ओव्हरमध्ये सामना टाय झाला, तर सामन्यात दुसरी सुवर ओव्हर खेळवली जाऊ शकते. भारत आणि अफगाणिस्तानमधील तिसऱ्या टी-20 सामन्यात असेच झाले. शेवटच्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताला विजयासाठी 12 धावा हव्या होत्या. पण रवी बिश्नोई याने षटकातील दिसऱ्या चेंडूवर आपली दुसरी विकेट घेतली आणि भारताला विजय मिळवून दिला. असे असले तरी, चाहत्यांच्या मनात तिसऱ्या सुवर ओव्हरविषयी असणारा प्रश्न कायम आहे.
तर याचे उत्तर होय असे आहे. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, तर नवीन आयसीसी नियमांनुसार सामना निकाली निघेपर्यंत कितीही वेळा सुपर ओव्हर खेळवली जाऊ सकते. अशात भारत आणि अफगाणिस्ता संघ देखीत तिसरी, चौथी किंवा त्यापेक्षा जास्त सुपर ओव्हर खेळू शकत होते.
सुपर ओव्हरमध्ये एकदा गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो गंलादज पुन्हा गोलंदाजीला येऊ शकत नाही. नवीन सुपर ओव्हलला नवीन गोलंदाज असणे आवश्यक असते. याच नियमानुसार बुधवारच्या सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानसाठी परिद अहमद, तर भारताकडून रवी बिश्नोई याने गोलंदाजी केली. फलंदाजांच्या बाबतीत पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेला खेळाडू दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी येऊ सकत नाही. सुपर ओव्हर सुरू होण्याआधीच संघांना आपल्या तीन फलंदाजांची नावे निश्चित करावी लागतात. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तेच फलंदाज खेळू शकतात, ज्यांनी पहिल्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केली नाही किंवा नाबाद राहिले. (IND vs AFG. What if there had been another super over tie? Read what the new ICC rules say)
महत्वाच्या बातम्या –
‘तुम्हाला धैर्याने खेळायला शिकवू शकत नाही…’, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर सिकंदर रझा संतापला
ICC U19 विश्वचषक स्पर्धा; गट, वेळापत्रक आणि सामन्यांचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे होणार? पाहा सर्व एकाच क्लिकवर