चेन्नई । येथे सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताची दारुण अवस्था झाली आहे. २० षटकांत भारताचे दिग्गज खेळाडू तंबूत परतले आहेत.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे भारताच्या रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली आणि मनीष पांडे यांना विशेष चमक दाखवता आली नाही. कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवरच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे (५), विराट कोहली (०) आणि मनीष पांडे (०) धावा करून परतले आहेत तर रोहित शर्मानेही ४४ चेंडूंचा सामना करताना २८ धावा केल्या आहेत.
सद्यस्थितीत मैदानावर केदार जाधव (३९) आणि एमएस धोनी ( ६ ) धावांवर खेळत आहेत.