भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर – गावसकर ट्रॉफी मध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या अजिंक्य राहणे याचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे. त्यानंतर सोशल मीडियावर, अजिंक्य राहणे यानेच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करावे या चर्चेला उधाण आले होते. अशातच अजिंक्य रहाणे याने या प्रकरणाला पूर्णविराम देत, आम्ही (विराट कोहली) चांगले मित्र आहोत आणि विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार राहील असे स्पष्ट केले होते. अशातच माजी इंग्लंड क्रिकेटपटू केविन पीटरसन याने अजिंक्य राहणे याच्या कामगिरीवर वक्तव्य केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या ५ फेब्रुवारी पासून ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. आणि दोन्ही संघांचा सराव सुरू झाला आहे. त्यापूर्वी पीटरसनने रहाणे आणि विराटच्या नेतृत्वाबद्दल प्रतिक्रिया दिली.
अजिंक्य रहाणे नंतर पुन्हा विराट कोहलीने संघाची जबाबदारी घेणे एक रंजक गोष्टीसारखे- केविन पीटरसन
अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला कसोटी मालिकेत २-१ ने धूळ चारली. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता. तरीसुद्धा युवा भारतीय संघाने प्रभारी कर्णधार रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघावर मात केली. त्यानंतर आता पुन्हा विराट कोहली भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.
यावर पीटरसन याने, स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात, अजिंक्य रहाणेनंतर पुन्हा विराट कोहलीने संघाची जबाबदारी घेणे एक रंजक गोष्टीसारखे आहे, असे वक्तव्य केले आहे.
या खेळाडूंवर असेल लक्ष
केविन पीटरसन पुढे म्हणाला, “विराट कोहली, जेम्स अँडरसन, अजिंक्य रहाणे हे या मालिकेत कसे प्रदर्शन करतात हे पाहायला मिळेल.” त्यानंतर तो म्हणाला,” इंग्लंड संघात जोफ्रा आर्चर आहे आणि भारतीय संघात चेतेश्वर पुजारा. जोफ्रा आर्चर पुजाराला बाद करू शकेल का? जसप्रीत बुमराह याचेदेखील संघात आगमन झाले आहे, त्यामुळे हे पाहाणेही उत्सुकतेचे असेल.”
भारतीय संघ विजयाचा १०० टक्के दावेदार
इंग्लंड संघासाठी ९ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पूर्व फलंदाज यांनी स्पष्ट केले आहे की , भारतीय संघ विजयाचा १०० टक्के दावेदार आहे. यात इंग्लंड संघाच्या रोटेशन पद्धतीची ही मुख्य भूमिका असू शकते. कारण संघातल्या मुख्य खेळाडूंना विश्राम दिला जाऊ शकतो. पुढे ते म्हणाले, “भारतीय संघाला मायदेशी खेळण्याचा फायदा होईल. इंग्लंड संघाने पाहिल्या २ कसोटी सामन्यासाठी आपला सर्वश्रेष्ठ संघ निवडला नाही. जॉनी बेअरस्टो संघात असायला हवा होता. तरी भारतीय संघ विजयाचा १०० दक्के दावेदार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
जयदेव उनाडकट चढला बोहल्यावर; गुपचूप उरकला विवाहसोहळा, पाहा फोटो
दमदार सुरुवातीनंतरही भारतीय संघातून बाजूला केलेला सदागोपन रमेश