टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारताचा तिसरा सामना रविवारी (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी उपांत्य फेरीसाठी महत्वाचा ठरणार आहे. यामुळे या सामन्यात सर्वांचे लक्ष भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली याच्यावरच असणार आहे. त्याने मागील दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या या तुफान फॉर्ममुळे दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूने त्याला एक प्रकारची सक्त ताकीदच दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांचा फलंदाज एडन मार्क्रम याने त्यांच्या गोलंदाजांनी विराट कोहली (Virat Kohli) याचा सामना करण्यासाठी खास रणनीती आखली आहे, असे विधान केले. “हा सामना रोमांचक होणार आहे. आमचे वेगवान गोलंदाज त्याला (विराट कोहली) गोलंदाजी करण्यास उत्सुक असतात. त्याने आपला फॉर्म परत मिळवला आहे, तसेच आमचे गोलंदाजही काही कमी नाही. ते ही सध्या चांगली कामगिरी करत आहेत,” असे मार्क्रमने म्हटले आहे.
विराट आशिया चषक 2022मध्ये आपल्या फॉर्ममध्ये परतला. तेव्हापासून त्याने 12 डावांमध्ये 78.28च्या सरासरीने 548 धावा केल्या आहेत. त्याने परत्यानंतर नाबाद 122 धावा ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. याबरोबच त्याने एक शतक आणि 5 अर्धशतके केली आहेत.
“भारताविरुद्धच्या सामन्यात एन्रिच नोर्तजे आणि कगिसो रबाडा सारखे वेगवाग गोलंदाज घातक ठरतील. पर्थमध्ये बाकीच्या खेळपट्ट्यांपेक्षा चेंडू अधिक उसळी घेतो. त्याचा फायदा आमचे गोलंदाज घेतील याचा मला विश्वास आहे. मी संघाच्या आवश्यकतेनुसार खेळतो. जर पहिल्यापासून आक्रमक फलंदाजी केली धावांची गती वाढवण्याचे काम मधली फळी करते ,” असेही मार्क्रमने पुढे म्हटले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ सुपर 12च्या दुसऱ्या ग्रुपच्या गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट अतिशय उत्तम आहे. त्यामुळे भारताचा कोणत्याही परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडचा श्रीलंकेलाही दणका! 65 धावांनी विजय मिळवत सेमी-फायनलकडे केली आगेकूच
न्यूझीलंड अन् श्रीलंका संघांवर ओढवली नामुष्की, टी20 विश्वचषकात ‘असं’ पहिल्यांदाच घडलं