आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. यातील पहिला सामना 6 डिसेंबरला अॅडलेड येथे खेळला जाणार आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारताला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मागील दौऱ्यात चांगलाच त्रास दिला आहे. यामध्ये नॅथन लायन-मिशेल स्टार्क या जोडीने 2014च्या मालिकेत दौऱ्यावर आलेल्या भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते.
या मालिकेत भारत पहिल्या सामन्यात जिंकण्याच्या अगदी जवळ आला असता 73 धावांतच 8 विकेट गमावत सामानही 48 धावांनी गमावला. या सामन्यात लायनने 12 विकेट्स घेतल्या होत्या.
या मालिकेत लायनने सर्वाधिक असे 23 विकेट्स तर भारताकडून आर अश्विनने 12 विकेट्स घेतल्या होत्या. ही मालिका भारताने 2-0 अशी गमावली होती.
तसेच आतापर्यंत लायनने 15 फलंदाजांना तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा बाद केले आहे. यामध्ये पाच भारतीय फलंदाजांचाही समावेश आहे. त्यातील भारतीय कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना त्याने सर्वाधिक वेळा बाद केले आहे.
ऑस्ट्रेलियात खेळताना लायनच्या नावावर भारता विरुद्ध 30 विकेट्स आहेत. तसेच अॅडलेड हे त्याचे घरचे मैदान असून येथील ओव्हल मैदानावर त्याने विक्रमी गोलंदाजी केली आहे. या मैदानावर सात कसोटी सामन्यात त्याने 37 विकेट्स घेतले आहेत.
या मालिकेतील पहिला सामना अॅडलेडवर असून यामध्ये 2014ची पुनरावृत्ती होणार की भारतीय संघ सामना जिंकत मालिकेत आघाडी घेणार याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–अॅडलेड कसोटीत टिम इंडियाकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी आहेत या चार खेळाडूंचे पर्याय
–विराटला गोलंदाजी करताना पाहून गोंधळलेल्या यष्टीरक्षक पंतला पडला हा प्रश्न