रविवारी (26 जानेवारी) ईडन पार्क (Eden Park), ऑकलँड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 7 विकेट्सने (Won by 7 wickets) धुव्वा उडवला आहे. तसेच मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. यापूर्वी शुक्रवारी पहिल्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत केले होते.
दुसरा टी20 सामना झाल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) भारताविरुद्ध सामन्यात कोणत्या ठिकाणी त्यांचे खेळाडू विचार करण्यात मागे राहिले आणि कोणत्या कारणामुळे त्याच्या संघाला भारताकडून दोनवेळा पराभवाचा सामना करावा लागला, याचे कारण सांगितले आहे.
भारताविरुद्ध आमच्या संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची गरज होती, जी पूर्ण करण्यात आमच्या फलंदाजांना अपयश आले. त्यामुळे आमच्या संघाला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, असे विलियम्सन पराभवाचे कारण सांगताना म्हणाला.
“आम्हाला अजून चांगली फलंदाजी करायला हवी होती. मला नाही वाटत की खेळपट्टीत काही बदल होते. आम्हाला विकेट्स घेण्याची आवश्यकता होती. आम्ही 10-15 धावा दूर होतो. आम्हाला पुढच्या सामन्यासाठी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. भारतासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध आम्हालाही चांगली कामगिरी करत पुढे जाण्याची गरज आहे,” असे दुसऱ्या टी20 सामन्यानंतर विलियम्सन म्हणाला.
दुसऱ्या टी20 सामन्यात विलियम्सनने 20 चेंडूत फक्त 14 धावा केल्या आहेत.
आता न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात तिसरा टी20 सामना हॅमिल्टनला 29 जानेवारीला होणार आहे.
काय सांगता! चक्क मार्टिन गप्टिलने युजवेंद्र चहलला हिंदीतून दिली शिवी, पहा व्हिडिओ
वाचा👉https://t.co/MVb4rknSdQ👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @Martyguptill @yuzi_chahal— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020
मांजरेकर-जडेजामध्ये पुन्हा एकदा ट्विटरवर शाब्दिक चकमक, वाचा-
वाचा👉https://t.co/lCmUxhk7P2👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @imjadeja @sanjaymanjrekar— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020