भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये महिला आशिया चषकातील (Women’s Asia Cup) फायनल सामना खेळला जात आहे. दांबुला क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. तत्पूर्वी हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये भारताची स्टार फलंदाज स्म्रीती मानधनानं (Smriti Mandhana) शानदार अर्धशतकी खेळी केली.
सलामीवीर स्म्रीती मानधनानं (Smriti Mandhana) फायनल सामन्यात 47 चेंडूत 60 धावांची खेळी खेळली. 60 धावांच्या खेळीत तिनं 10 चौकार लगावले, यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 127.66 राहिला. आशिया चषकाच्या फायनलमध्ये मानधनानं भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर कवीशा दिलहारीच्या चेंडूवर मानधना कर्णधार चमारी अट्टापटूच्या हातामध्ये झेलबाद होऊन तंबूत परतली.
फायनल सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
भारतीय महिला संघ- स्म्रीती मानधना, शफाली वर्मा, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कनवर, रेणुका ठाकूर सिंग
श्रीलंका महिला संघ- विश्मी गुणरत्ने, चमारी अट्टापटू(कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिल्हारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी(यष्टीरक्षक), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचिन निसानसाला
महत्त्वाच्या बातम्या-
“मी त्याला एक चांगला क्रिकेटर बनवण्यासाठी…”, रिकी पाँटिंगने केला या क्रिकेटरबद्दल खळबळजनक खुलासा
संजू सॅमसननं जिंकलं चाहत्यांच हृदय…!!! पहिल्याच टी20 सामन्यात केलं असं काहीतरी…
शाब्बास मनू! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलं पहिलं मेडल; नेमबाजीत कांस्य पदकावर निशाणा