इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले होते. यावेळी कोलकाता संघातील सर्व खेळाडू खूप आनंदात होते. सामन्यानंतर कोलकाता संघाचे मालक आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यासोबत खेळाडूंनी जवळजवळ दोन ते तीन तास डान्स केला होता. त्यानंतर जंगी पार्टी देखील केली होती. याबद्दलचा खुलासा कोलकाता संघाचा माजी सलामीवीर मनविंदर बिस्लाने केला आहे. मनविंदर याच्या उत्कृष्ट खेळीने आणि संघातील सर्व खेळाडूंच्या कामगिरीने या सामन्यात कोलकाता संघ विजयी झाला होता.
मनविंदर बिस्लाने ईएसपीएन क्रिकइंफोसोबत बोलताना सांगितले की, “मला संघाला विजय मिळून द्यायचा होता. आम्ही विजयाच्या जवळ पोहचलोही होतो. फक्त 50 धावा कमी होत्या. त्यावेळेस मी बाद झालो होतो. माझी शेवटपर्यंत खेळायची इच्छा होती. मी बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर जाऊन बसलो, तेव्हा मी संपूर्ण सामना होईपर्यंत माझ्या पायातील पॅड देखील काढले नव्हते. जेव्हा मनोज तिवारीने शेवटचा विजयी शॉट मारला; तेव्हा मी बाद होण्याचे दुःख विसरून संघाच्या विजयात सहभागी झालो.”
मनविंदर बिस्लाने असेही सांगितले की, “आम्ही सामना जिंकल्यानंतर खूप धमाल केली. आम्ही सर्वजण जवळपास 2-3 तास नाचत होतो. तेव्हा शाहरुख सरांसोबत देखील आम्ही सर्वांनी डान्स केला. हा आनंद मला घरच्यांसोबत वाटायचा होता. म्हणून मी आई-वडिलांना फोन केला होता. तेव्हा शाहरुख सरांनी मला विचारले की, मी बोलू शकतो का? त्यांनी माझ्या घरच्यांसमोर माझे कौतुक केले होते. तो क्षण माझासाठी अविस्मरणीय होता. ही माझ्या पत्नीसाठी वाढदिवसाची अतिशय सुंदर भेट होती.”
कोलकाता आणि चेन्नईच्या अंतिम सामन्यात चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी घेतली होती. चेन्नई संघाने 20 षटकात 3 विकेट्स देत 190 धावा काढल्या होत्या. सुरेश रैनाने सर्वाधिक 38 चेंडूमध्ये 73 धावा काढल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. तर मायकल हसीने 54 धावा तर मुरली विजयने 42 धावा काढल्या होत्या. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या 9 चेंडूवर 14 धावा काढल्या होत्या.
कोलकाता संघासाठी जॅक्स कालिस, रजत भाटिया आणि शाकिब अल हसन यांनी चेन्नईचे एक-एक बळी घेतले. 191 धावांचे लक्ष्य पार करणे कोलकाता संघासाठी सोपे नव्हते. तरीही त्यांनी लक्ष गाठून विजयाचे पारडे आपल्याकडे जुकवले होते. या सामन्यात मनविंद बिस्लाने सलामीला फलंदाजी करताना 89 धावा चोपल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ गोलंदाज
WTC फायनल: ‘रोहित खेळला तर द्विशतक करुनचं शांत बसेल,’ दिग्गजाला आहे विश्वास
इंग्लंड सरकारचा मोठा निर्णय, दौर्यावर येणार्या भारतीय खेळाडूंना दिली ‘ही’ सूट