---Advertisement---

MI vs RCB: मुंबईच्या डावाला सुरुंग लावणारा ‘तो’ खेळाडू ठरला गेमचेंजर!

---Advertisement---

आयपीएल 2025च्या 20व्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अटीतटीचा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने यजमान मुंबई इंडियन्सला 12 धावांनी हरवले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. ट्रेंट बोल्टने सलामीवीर फिल साल्टला 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर, विराट कोहलीने देवदत्त पडिकलसह डावाची सूत्रे हाती घेतली आणि धावसंख्या 95 धावांपर्यंत नेली. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 91 धावांची अद्भुत भागीदारी झाली.

15व्या षटकात 67 धावा काढल्यानंतर विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीनंतर लगेचच लियाम लिव्हिंगस्टोनही शून्यावर बाद झाला. एकाच षटकात दोन मोठ्या विकेट गमावल्यानंतरही, कर्णधार रजत पाटीदारने जितेश शर्मासह वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली आणि संघाचा धावसंख्या 200 च्या पुढे नेली. यादरम्यान, रजत पाटीदार आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला. पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 221 धावा केल्या. पाटीदारने 64 धावांची खेळी केली. ज्यात त्याने 5 चाैकार व 4 षटकार मारले. जितेशने नाबाद 40 धावा केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. बोल्टने 2 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सना 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 209 धावा करता आल्या. अशाप्रकारे, तिलक वर्माचे जलद अर्धशतक आणि हार्दिक पांड्याची धडाकेबाज खेळी वाया गेली. त्याच वेळी, आरसीबीने 10 वर्षांनंतर वानखेडेवर मुंबईला हरवण्यात यश मिळवले. यापूर्वी 2015 मध्ये आरसीबीने मुंबईविरुद्ध विजय मिळवला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---