विश्वचषक २०११ म्हटलं तरी भारतीय चाहत्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो क्षण म्हणजे एमएस धोनीने वानखेडे स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात खेचलेला विजयी षटकार. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने ११ वर्षांपूर्वी २ एप्रिल २०११ रोजी विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात षटकार खेचत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. या विजयामुळे भारताने पुन्हा एकदा २८ वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरले होते.
या सामन्यात धोनीने वापरलेली ती बॅट क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ठरली आहे. त्याची ही बॅट लंडनमधील चॅरिटी डिनरमध्ये लिलावात जुलै २०११ मध्ये मुंबईच्या आरके ग्लोबल या गुंतवणूक कंपनीने ७२ लाखांना विकत घेतली होती. यातून आलेले पैसे साक्षी फाउंडेशन या धोनीची पत्नीच्या चॅरिटी फाउंडेशनसाठी दिले आहेत. ही चॅरिटी गरजू लहान मुलांसाठी काम करते. त्याच्या या बॅटची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधेही नोंद आहे.
#OnThisDay in 2011, India won the ICC Cricket World Cup with a massive @msdhoni six!
Who could forget this moment! ???? ⬇️ pic.twitter.com/Xy3xCogRIs
— ICC (@ICC) April 2, 2018
विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात धोनीने ही बॅट वापरली होती. तसेच त्याने या सामन्यात ७९ चेंडूत ९१ धावा करून भारताला श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाने वानखेडेवर उंचावलेली ट्रॉफी आठवतेय? पाहा कशी तयार झाली होती विश्वचषकाची ही ट्रॉफी
का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?
ईशान-सूर्याच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्सकडून आले अपडेट; राजस्थानविरुद्ध…