---Advertisement---

रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात आचरेकरांचे ‘हे’ दोन शिष्य भिडणार!

On: मंगळवार, जून 21, 2022 9:46 AM
Ramakant-Achrekar
---Advertisement---

बुधवारी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेशचे संघ येथील चिन्नास्वामी मैदानावर भिडतील तेव्हा खेळाडूंसह अशा दोन प्रशिक्षकांची लढत होईल ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि त्यांचे मुंबईचे सहकारी अमोल मुझुमदार हे क्रिकेटपटू सहसा मुंबईशी संबंधित असलेल्या मजबूत मानसिकतेसाठी ओळखले जातात. या दोघांमध्ये आणखी एक साम्य आहे ती म्हणजे या दोघांनी महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या देखरेखीखाली आपले खेळण्याचे कौशल्य सुधारले आहे. एक खेळाडू म्हणून प्रदीर्घ काळ मुंबईचे प्रतिनिधित्व केल्यानंतर चंद्रकांत मध्य प्रदेशमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघ १९९८ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता.

प्रशिक्षक म्हणून त्यांनी मुंबईच्या पद्धतीने मध्य प्रदेशच्या संघाचे नेतृत्व केले, त्यामुळेच हा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला. पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, सर्फराज खान आणि सुवेद पारकर यांसारख्या पुढच्या पिढीच्या फलंदाजांनी सजलेल्या ४१ वेळा चॅम्पियन मुंबईचे आव्हान मध्य प्रदेशसमोर असेल. हे सर्व फलंदाज २५ वर्षाखालील असून मध्य प्रदेशच्या गोलंदाजी आक्रमणाला उद्ध्वस्त करण्यासाठी सज्ज आहेत.

कुमार कार्तिकेयवर संघाची जबाबदारी
मध्य प्रदेशकडे कुमार कार्तिकेय हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे पण काही अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत इतर गोलंदाज तितकेसे प्रभावी ठरले नाहीत. प्रशिक्षक म्हणून प्रथमच संघाला चॅम्पियन बनवण्यात मजुमदार कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. त्यामुळे पंडितला सहाव्यांदा हे विजेतेपद मिळवायचे आहे. प्रशिक्षक म्हणून त्याने विदर्भ आणि मुंबईसाठी ५ रणजी विजेतेपद पटकावले आहेत. पंडित म्हणाले की, “अमोलला माझी विचारसरणी आणि मार्ग माहिती आहे. मलाही त्याच्याबद्दल अशीच माहिती आहे. आम्ही दोघेही मुंबई क्रिकेटचा मार्ग अवलंबत आलो आहोत.”

दोघांनाही एकमेकांबद्दल माहिती आहे
दुसरीकडे मजुमदार म्हणाले की, “माझ्यात आणि चंदूमध्ये काही फरक नाही. आम्ही दोघांनीही अशाच परिस्थितीत प्रगती केली आहे. अंतिम सामना हे खेळाडूंबद्दल अधिक आहे, जे मैदानात असतील आणि त्यांना त्यांच्या संघासाठी विजेतेपद मिळवायचे आहे.”

दरम्यान, मध्य प्रदेश संघाला तब्बल २३ वर्षांनंतर या मैदानावर संघाला चॅम्पियन बनण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. त्यामुळे संघ ही संधी सहजासहजी सोडू इच्छिनार नाही म्हणूनच हा सामना रंजक होईल असे अनेकांकडून सांगण्यात येत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘आम्ही मालिका जिंकण्यासाठी उत्सुक’, राहुल द्रविडने व्यक्त केली भावना

‘तो अजून शिकत आहे’, भारताच्या माजी दिग्गजाने केली पंतची पाठराखण

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा झटका!, दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---