---Advertisement---

भारताने विजय मिळवला पण चर्चा झाली नागीण डान्सची!

On: सोमवार, मार्च 19, 2018 7:19 PM
---Advertisement---

काल कोलंबोमध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवला. भारताला हा विजय मिळवता आला तो दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकारामुळे.

कार्तिकने भारताला १२ चेंडूत ३४ धावांची गरज असताना फलंदाजीला येऊन विजय मिळवून दिला होता. त्याने फलंदाजीला आल्यावर पहिल्या तीन चेंडूंवरच दोन षटकार आणि एक चौकार मारून भारताचा दबाव कमी केला. परंतु त्याच्या जोडीला खेळत असलेल्या विजय शंकरला फटके मारण्यात अपयश येत होते.

त्यामुळे भारताच्या विजयाचे नाट्य शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले होते. भारताला विजय मिळवण्यासाठी एका चेंडूत ५ धावांची गरज असताना कार्तिकने षटकार खेचून भारताचा विजय निश्चित केला. पण शंकरने खेळलेल्या धीम्या खेळीला मात्र सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल करण्यात आले.

तसेच जेवढी भारताच्या विजयाची चर्चा सोशल मीडियावर रंगली त्यापेक्षा जास्त नागीण डान्सची चर्चा झाली. त्याचे कारण असे की निदाहास ट्रॉफीच्या अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश अशी करो या मरो ची लढाई रंगली होती.

या सामन्यात बांग्लादेशने अखेरच्या क्षणी श्रीलंकेवर विजय मिळवला होता. पण या सामन्यादरम्यान या दोन संघातील खेळाडूंमध्ये वाद पाहायला मिळाले तसेच सामना संपल्यानंतर बांग्लादेश संघाने नागीण डान्स करत श्रीलंका संघाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

याचमुळे काल अंतिम सामन्यानंतर बांग्लादेशच्या नागीण डान्सलाही खूप ट्रोल करण्यात आले. तसेच सोशल मीडियावर कार्तिकचे मात्र जबरदस्त कौतुक करण्यात आले. तसेच काहींनी कार्तिकचा शेवटच्या चेंडुवरील षटकारामुळे एम एस धोनीची आठवण आल्याचीही प्रतिक्रिया दिली. 

https://twitter.com/HaramiParindey/status/975443495161774080

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment