भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया ए विरोधात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारत ए टीम जाहीर केली आहे. भारताने 2 खेळाडूंना कर्णधार बनवले आहे. 3 सामन्यांची वनडे मालिकेत 20 सप्टेंबरपासून सुरू होईल. टीममध्ये अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळाली आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना जागा मिळाली नाही.
बीसीसीआयने इंडिया A टीमसाठी दोन खेळाडूंना कर्णधारपद दिले आहे. पहिल्या वनडे सामन्यात रजत पाटीदार (Rajat patidar) इंडिया A संघाचा कर्णधार असेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तिलक वर्मा (Tilak Verma) संघाचा कर्णधार असेल. ऑस्ट्रेलिया A विरोधात होणारे सर्व सामने कानपूर येथे खेळले जातील.
पहिला सामना: 30 सप्टेंबर, दुसरा सामना: 3 ऑक्टोबर तिसरा सामना: 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होतील.
काही दिवसांपूर्वी असे रिपोर्ट्स आले होते की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना इंडिया A टीममध्ये जागा मिळेल, जेणेकरून ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3 सामन्यांसाठी तयारी पूर्ण करू शकतील. पण बोर्डाने इंडिया A टीममध्ये दोघांनाही संधी दिली नाही. आता प्रश्न उभा राहतो की, रोहित आणि विराट यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये संधी मिळेल की नाही?
पहिल्या वनडे सामन्यासाठी भारत A टीम:
रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधू, गुरजापनीत सिंह, युद्धवीर सिंह, रवि बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंग
दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारत A टीम:
तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधू, गुरजापनीत सिंह, युद्धवीर सिंह, रवि बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), हर्षित राणा, अर्शदीप सिंह






