आयपीएल 2025 स्पर्धेदरम्यान मॅच फिक्सिंगचा आरोप आणि क्रिकेट विश्वात खळबळ निर्माण केली आहे.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे संयोजक जयदीप बिहानीने राजस्थान रॉयल्स संघाच्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या पराभवानंतर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता राजस्थान रॉयल्स संघाने या सर्व आरोपांना खोटे ठरवत स्पष्टीकरण दिले आहे. बिहानीने सामन्याच्या रिझल्ट बरोबर छेडछाड केली आहे असे वक्तव्य सुद्धा केले होते. आर- आर ने कोणत स्पष्टीकरण दिलं आहे जाणून घ्या.
जयदीप बिहानी यांनी एका प्रतिक्रियेद्वारे राजस्थान रॉयल संघाच्या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित केले होते. याबरोबरच त्यांनी राजस्थान रॉयल्स, राजस्थान स्पोर्ट्स कौन्सिल आणि बीसीसीआय वर ते एकमेकांसोबत मिळाले आहेत असे आरोप केले होते.
राजस्थान रॉयल्स मॅनेजमेंटने या सर्व आरोपांना खोटे ठरवले आहे. संघाचे उच्च अधिकारी दीप रॉय यांनी जयदीप बिहानी द्वारा केलेल्या आरोपांना खोटे आणि निराधार सांगितले आहे.
रॉयल्स मॅनेजमेंटने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आम्ही या सर्व आरोपांना खोटे ठरवतो. हे सर्व आरोप केवळ एखाद्याचे लक्ष भटकवण्यासाठी आहेत. तसेच हे आरोप राजस्थान रॉयल्स संघ, राजस्थान रॉयल्स स्पोर्ट्स कौन्सिल आणि बीसीसीआयच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी क्रिकेटच्या प्रतिष्ठेला धुळीत मिळवण्याचे काम केले आहे. राजस्थानने स्पष्ट केले आहे की, ते स्पर्धेच्या चांगल्या योजनांसाठी राजस्थान स्पोर्ट्स कौन्सिल आणि बीसीसीआय सोबत मिळून काम करत आहेत.
KKR vs GT: हर्षा भोगले यांनी का टाळलं काॅमेंट्री? सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण