---Advertisement---

फलंदाजीत ‘हे’ बदल कर, पाकिस्तानी दिग्गजाचा विराट कोहलीला सल्ला

---Advertisement---

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा अंतिम सामना हा जास्त दूर नाही. न्यूझीलंड आणि भारत या दोन संघात हा सामना साऊथॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान रंगणार आहे. या सामन्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली व न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन या दोघांवर पूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. विराट सध्या थोड्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू रमीझ राजाने विराटला एक सल्ला दिली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहली चांगली कामगिरी करू शकेल असे पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजाचे मत आहे. त्याला फक्त त्याच्या फलंदाजीमध्ये थोडा सुधार करण्याची गरज आहे, असे रमीझने सांगितले.

रमीझच्या म्हणण्यानुसार ‘गेल्या काही महिन्यांत त्याच्या फलंदाजीत त्याला किरकोळ दोष जाणवला आहे. लेग साइडमध्ये शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याची मनगट ही जास्त फिरत आहे. जर तो सरळ खेळला तर त्याला कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, विराटला माहित आहे की त्याने काय करावे. म्हणून काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही.’

राजाने इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की, ‘कधीकधी आपण धावा किंवा शतके न करण्याचा दबाव आपल्यावर स्वतः बनवतो. जर पहिल्या 20-25 षटकांत विराटने चेंडूच्या लाइनमध्ये शॉट्स खेळले आणि लेगच्या बाजूने आपल्या मनगटाला जास्त हलवले नाही, तर तो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नक्कीच यशस्वी होऊ शकेल.’

विराटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आत्तापर्यंत 14 सामन्यांमध्ये 43.85 च्या सरासरीने 877 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने दोन शतके केली आहेत. अजिंक्य रहाणे (1095) आणि रोहित शर्मा (1030) यांनी भारतीय कर्णधारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

विराटचा सध्याचा कसोटीमधील फॉर्म

मागील 18 महिन्यांमध्ये विराटला एकही शतक ठोकता आले नाही. त्यानी त्याचे शेवटचे शतक हे नोव्हेंबर 2019 मध्ये कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात केले होते. त्या सामन्यात त्याने 136 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आतापर्यंत सात कसोटी सामने विराटने खेळले आहे, पण एकही सामन्यात त्याला शतकाची नोंद करता आली नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी भारतीय संघ साऊथॅम्प्टनला पोहोचला आहे.  तथापि, भारतीय संघाचा रस्ता सोपा राहणार नाही.

कारण गेल्या वर्षी न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाविरुद्ध विजय मिळवला आहे. त्या मालिकेत न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर विराटची बॅट शांत राहिली होती. इंग्लंडमध्येही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल राहील. अशा परिस्थितीत भारतीय संघासमोर न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचे एक कठीण आव्हान असेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याअगोदर न्यूझीलंड खेळेल दोन कसोटी सामने

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीच्या बाबतीतही न्यूझीलंडचाचे पारडे भारतावर भारी असेल. कारण या सामन्याआधी ते इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळतील, तर भारतीय संघ दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत भारतीय संघाला या सामन्यात यशस्वी व्हायचे असेल, तर विराटला फॉर्ममध्ये येणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या

धोनीचा वारसा पुढे चालवण्यासाठी सज्ज आहे झारखंडचा ‘हा’ युवा यष्टीरक्षक

परदेशी खेळाडूंना मोठा झटका! उर्वरित आयपीएलला नकार दिल्यास बीसीसीआय करणार ‘ही’ कारवाई

क्रिकेटच्या काळ्या अध्यायाचे ‘खलनायक’, अवघ्या ३२व्या वर्षी विमान अपघातात झाला दुर्दैवी मृत्यू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---