---Advertisement---

‘भारताने खरा हिरा गमावला…’, रतन टाटा यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा

---Advertisement---

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री निधन झाल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील ब्रीझ कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना रविवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि सोमवारी त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याने प्रकृती खालावली. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. पण बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. रतन टाटांच्या निधनानंतर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.

वीरेंद्र सेहवागने लिहिले, “आम्ही भारताचे खरे रतन, श्री रतन टाटा जी गमावले. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान राहील आणि ते सदैव आपल्या हृदयात राहतील. ओम शांती.”

हरभजन सिंगने लिहिले, “आरआयपी सर, सतनाम वाहेगुरु, रतन टाटा जी आधुनिक भारताच्या निर्मात्यांपैकी एक म्हणून नेहमी आपल्या हृदयात जिवंत राहतील. त्यांचे नेतृत्व, नम्रता आणि नैतिकता आणि मूल्यांप्रती अटूट बांधिलकी यांनी एक मानक स्थापित केला आहे जो पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचा वारसा सदैव स्मरणात राहील, केवळ त्यांनी बांधलेल्या कंपन्यांसाठीच नाही, तर त्यांनी आपल्या करुणा आणि औदार्याने स्पर्श केलेल्या असंख्य लोकांसाठीही. माझ्या मनापासून शोक व्यक्त करतो.”

व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी लिहिले, “आपल्या देशाच्या महापुरुषांपैकी एक, श्री रतन टाटाजी यांचे निधन झाल्यामुळे एका युगाचा अंत झाला. आपल्या देशासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी आणि एक अतुलनीय आदर्श म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील. जगभरातील त्यांच्या सर्व हितचिंतक आणि चाहत्यांचे मनःपूर्वक संवेदना. ओम शांती”

याशिवाय व्यंकटेश प्रसाद, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि शिखर धवन,सुरेश रैना या क्रिकेट स्टार्सनीही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. पाहूया त्यांच्या पोस्ट्स-

हेही वाचा-

भारताच्या ‘या’ दिग्गजाच्या नावावर असते 120 शतक पण…
INDW vs SLW; शानदार विजयासह भारताच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत
IND vs BAN; बांगलादेशविरूद्ध भारताने रचला इतिहास, षटकारांचा पाडला पाऊस!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---