भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी रहाणेला तब्बल 18 महिन्यानंतर भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. एवढ्या मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या रहाणेचे प्रदर्शन संघासाठी सर्वात महत्वाचे ठरले. संघ अडचणीत असताना रहाणे खेळपट्टीवर आला आणि दबावाच्या परिस्थितीत मोठी खेळी केली. अवघ्या 11 धावां कमी पडल्याने त्याचे शतक हुकले. रहाणेच्या 89 धावांमुळे भारताला संघ सुस्थितीत पोहोचला. त्याचा याच खेळीनंतर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याचे कौतुक केले आहे.
रहाणे याने तिसऱ्या दिवशी भरत लवकर बाद झाल्यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकूरसोबत जोडी जमवली. दोघांनी सातव्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले.रहाणेने 129 चेंडूचा सामना करत 89 धावा केल्या. या सामन्यातील ही भारतीय संघासाठी सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याच्या या संघर्षपूर्ण खेळीनंतर त्याचे कौतुक करताना रवी शास्त्री म्हणाले,
“अजिंक्य हा खरा टीम मॅन आहे. त्याला जी जबाबदारी देण्यात येते ती तो अगदी प्रामाणिकपणे पार पाडतो. बारा व खेळाडू म्हणून मैदानावर ड्रिंक्स घेऊन जाण्यातही त्याला कमीपणा वाटत नाही. आज त्याने ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना केला ते कौतुकास्पद आहे.”
शास्त्री यांच्या व्यतिरिक्त हरभजन सिंग व सौरव गांगुली या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी देखील त्याचे कौतुक केले. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात झटपट बाद करणे आवश्यक आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे 296 धावांची आघाडी असून, चौथ्या दिवशी भारतीय संघ सामन्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.
(Ravi Shastri Said Ajinkya Rahane In Perfect Teamman After WTC Final Knock)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स