भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर रंगला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने खोळंबा घातला, त्यामुळे सामना लवकरच बंद करावा लागला, तर दुसऱ्या दिवशीही पावसाने हजरी लावली आणि एकही चेंडू न टाकता दिवसाचा खेळ संपला. तत्पूर्वी दोन्ही संघात चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात एका स्टार भारतीय अष्टपैलूने अशी कामगिरी केली जी आजवर कोणालाही जमली नाही.
रवींद्र जडेजाने (Ravichandran Jadeja) अलीकडेच बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात असा रेकाॅर्ड केला आहे. जो क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात इतर कोणत्याही खेळाडूने जमला नाही. जडेजा कसोटीमध्ये 2,000 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 200 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध भारताच्या पहिल्या कसोटीदरम्यान त्याने ही कामगिरी केली.
सध्या भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे. दोन्ही दिवशी पावसाने व्यत्यय आणला. दुसऱ्या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात बांगलादेश 3 गडी गमावून 107 धावांवरती खेळत आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एक विकेट घेतली, तर कसोटीत 300 विकेट्स घेणाऱ्या आणि 3000 हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सामील होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
निकोलस पूरनचा टी20 मध्ये धुमाकूळ! ‘या’ स्टार खेळाडूचा मोडला रेकाॅर्ड
5 क्रिकेटपटू ज्यांनी कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली, नंतर फलंदाजीत कमावलं नाव
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं