काही दिवसात इंग्लंड संघ भारत दौर्यावर येणार आहे. कारण भारत आणि इंग्लंड संघात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला 5 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा या मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही. रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीत खेळला गेला होता. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना रवींद्र जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याच्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला होता. त्यामुळे त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. त्यांनंतर त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया केली. त्यामुळे रवींद्र जडेजाला ठीक होण्यासाठी कमीत कमी सहा आठवडे लागू शकतात. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध होणार्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचा भाग असणार नाही.
इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्यावर येणार आहे. यावेळी भारत आणि इंग्लंड संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका, 5 टी-20 सामन्याची मालिका आणि 3 वनडे सामन्याची वनडे मालिका खेळली जाणार आहे. पहिल्यांदा कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथे खेळले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथे खेळले जाणार आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार टी-20 आणि वनडे मालिकेसाठी जडेजाला सहभागी करण्याचा निर्णय नंतर घेतला जाईल.
दुखापत झाल्यामुळे 32 वर्षीय रवींद्र जडेजाला पहिल्या दोन सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात निवडण्यात आले नव्हते. त्याचबरोबर जडेजा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात सहभागी झाला नव्हता. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनाच्या प्रक्रियेतून जात आहे.
इंग्लंड विरुद्ध होणार्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय संघात रविंद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली़ आहे. अक्षर पटेल सुद्धा जडेजा प्रमाणे डाव्या हाताने गोलंदाजी करतो. त्याचबरोबर त्यांच्यामधे फलंदाजी करण्याची क्षमता आहे. भारतीय संघाला जडेजा शिवाय भारतात खेळणे म्हणजे नुकसानकारक आहे. कारण भारतात रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांची फिरकी जोडी खूप प्रभावी ठरते. त्याचबरोबर मागील वर्षी क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट मध्ये रवींद्र जडेजा महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला होता.
इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केएल राहुल, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत हार्दिक पंड्या, रिद्धीमान साहा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव
महत्वाच्या बातम्या:
स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला तो गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल