---Advertisement---

RCB vs PBKS: फायनल सामन्यापूर्वी आरसीबी कर्णधाराचे विराटबद्दल मोठे वक्तव्य! म्हणाला…

---Advertisement---

RCB vs PBKS IPL Final 2025: यंदाच्या आयपीएलचा फायनल सामना (IPL 2025 Final) (3 जून) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघ आमने-सामने असतील. दरम्यान दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल. पण फायनल सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने माध्यमांशी बोलताना जेतेपद जिंकण्याची आशा व्यक्त केली. दरम्यान, त्याने धडाकेबाज मधल्या फळीतील फलंदाज टिम डेव्हिडच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल देखील मोठे विधान केले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या (TOI) रिपोर्टनुसार रजत पाटीदारने टिम डेव्हिडच्या (Tim David) उपलब्धतेवर सांगितले की, वैद्यकीय संघाने अद्याप त्याच्या खेळण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाटीदारने त्याच्या खेळण्याची पुष्टी केलेली नाही.

विराट कोहली 18 वर्षांपासून आरसीबीकडून खेळत आहे, परंतु अद्याप आरसीबी संघ आणि विराटला आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आले नाही. दरम्यान रजत पाटीदार म्हणाला की, “विराटची उपस्थिती आरसीबी खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे आणि यावेळी विराट कोहलीसाठी जेतेपद जिंकण्यासाठी संपूर्ण संघ आपले सर्वस्व देईल.” (Rajat Patidar Statement On RCB Team)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 3 आयपीएल फायनल खेळले आहेत, परंतु प्रत्येक वेळी संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2009, 2011 आणि 2016 मध्ये, आरसीबीचा संघ ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचला होता पण त्यांना पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्जबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी 2014 मध्ये आतापर्यंतचा एकमेव आयपीएल फायनल खेळला आहे, ज्यामध्ये त्यांना केकेआरकडून पराभव पत्करावा लागला. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ 11 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचला आहे.

आयपीएल 2025 मध्ये दोन्ही संघाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. या हंगामात दोन्ही संघ आतापर्यंत 3 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात आरसीबीने बाजी मारली तर 1 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेवटी क्वालिफायर 1 मध्ये दोन्ही संघ भिडले होते. परंतु, आरसीबीने पंजाबचा वनसाईड धुव्वा उडवत आयपीएल 2025च्या फायनलमध्ये धडक मारली. दुसरीकडे पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचण्याची संधी मिळाल्यांतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबसमोर 5 वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे आव्हान होते पण या सामन्यात श्रेयस अय्यरने दम दाखवला. त्याने शेवटी खणखणीत षटकार ठोकत संघासाठी फायनलचे दरवाजे खुले केले. आता फायनलमध्ये कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---