आयपीएल 2025 स्पर्धेमधील 20वा सामना आज (07 एप्रिल) खेळला जात आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बंगळुरू संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.
बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 5 खेळाडू गमवून 221 धावा केल्या आहेत. आणि मुंबईला जिंकण्यासाठी 222 धावांचं आव्हान दिलं आहे.
बंगळुरू संघासाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या. त्याने 42 चेंडूत 67 धावा केल्या. त्यादरम्यान 8 चौकार तर 2 षटकार झळकावले. कर्णधार पाटीदारने 32 चेंडूत 64 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 4 षटकार झळकावले. तसेच देवदत्त पडिकलने 37 धावा, तर जितेश शर्माने 40 धावा केल्या.
तसेच मुंबईसाठी ट्रेंट बोल्टने 4 षटकात 57 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. याबरोबरच कर्णधार हार्दिक पांड्याने 4 विकेट्स घेतल्या. विघ्नेश पुथुरने देखील 1 विकेट घेतली.
आता मुंबई हे आव्हान पूर्ण करू शकेल का हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.