दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहलीला (Virat Kohli) मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावे लागले होते. आता केपटाऊनच्या मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याचे पुनरागमन होणार आहे. हा सामना मालिका जिंकण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या मुलाखतीत विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Sa vs Ind 3rd test)
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत म्हटले की, “आम्ही जेव्हा तो काळ आठवतो तेव्हा विश्वास ठेवणं देखील कठीण आहे. जेव्हा मला कर्णधारपद देण्यात आले त्यावेळी आम्ही ७ व्या क्रमांकावर होतो, आता आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही. कारण आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. हे संपूर्ण संघाने घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे.”
हे नक्की पाहा :
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी संघासमोर एक योजना ठेवली होती. आमच्या उत्कटतेने, आम्ही कसोटी क्रिकेटमध्ये उत्साह निर्माण करण्याचा आणि सामने जिंकण्याचा प्रयत्न केला. हेच कारण आहे की, आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करत आहोत.” गेल्या ६ वर्षांपासून भारतीय संघ कसोटी संघांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे.
“वनडे आणि टी२० क्रिकेट खूप वेगळं आहे. तर कसोटी क्रिकेट देखील वेगळ्या प्रकारे चालतं. आम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. आता आम्हाला विचार करावा लागतो की, नेमकं कुठल्या गोलंदाजाला संघाबाहेर बसवायचं. आमचा संघ सर्वोत्तम संघ असण्याच कारण आमचे वेगवान गोलंदाज आहेत.” असे विराट कोहली म्हणाला.
यापूर्वी भारतीय संघाचे कर्णधारपद एमएस धोनी कडे होते. परंतु २०१४ मध्ये एमएस धोनीने संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीला ही जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून तो ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडताना दिसतोय.
महत्वाच्या बातम्या :
विक्रमांची लागणार रास! केपटाऊन कसोटीत तब्बल सात खेळाडूंकडे पराक्रमांची सुवर्णसंधी
वामिकाचा वाढदिवस आणि भारताच्या विजयाचे आहे खास कनेक्शन, पहिल्या बड्डेला द. आफ्रिका होणार फत्ते!