---Advertisement---

भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पॉंटिंगने घेतली ‘या’ तिघांची नावे

On: शुक्रवार, फेब्रुवारी 11, 2022 9:02 PM
axar-patel-dc
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याने नुकतीच तीन भारतीय खेळाडूंची नावे सांगितली आहेत, जे येत्या काळात त्यांच्या प्रदर्शनाने जगभरात स्वतःचे नाव करू शकतात. आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदी पॉंटिंग कार्यरत आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या युवा खेळाडूंची गुणवत्ता पाहून पॉंटिंग चांगलाच प्रभावित झाला आहे. आयसीसी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पॉंटिंगने तीन युवा खेळाडूंची नावे सांगितली आहेत, जे भविष्यात मोठे नाव करू शकतात.

पॉंटिंगने निवडलेल्या तीन युवा खेळाडूंमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ, वेगवान गोलंदाज आवेश खान आणि चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड यांची नावे घेतली आहेत. पॉंटिंग म्हणाला की, “यामध्ये आम्ही रिटेन केलेला पृथ्वी शॉ आहे, ज्याने मागच्या आयपीएल हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले होते. मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्याविषयी सर्वकाही प्रत्येकाला माहिती आहे. मला अजूनही वाटते की, एका व्यक्तीच्या रुपात तो स्वतःविषयी खूप काही शिकत आहे आणि खेळाडूच्या रूपातही खूप काही शिकत आहे. तो असा खेळाडू आहे, जेव्हा त्याला चांगली फलंदाजी करता येत नाही, तेव्हा तो जास्त फलंदाजी करू इच्छित नसतो. जेव्हा तो चांगली फलंदाजी करत असतो, तेव्हा त्याला प्रत्येक वेळी फलंदाजी करण्याची इच्छा असते.”

ऋतुराज गायकवाडविषयी पॉंटिंग म्हणाला की, “मला दुसरा खेळाडू जो वाटतो, तो चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड आहे. तो खूपच अप्रतिम आहे. मी त्याला टी२० मध्येच खेळताना पाहिले आहे. तो आयपीएल जिंकणाऱ्या संघाचा भाग होता, ज्याला हंगामाच्या सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळाली. सर्वांना माहिती आहे की, तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तांत्रिकदृष्ट्या किती परिपूर्ण आहे. आयपीएल संपता-संपता त्याने काही आश्चर्यकारक गोष्टी केल्या. तो असा खेळाडू आहे, जो येत्या काळात भारतासाठी प्रत्येक प्रकारात खेळेल.”

तिसऱ्या खेळाडूविषयी बोतलाना पॉंटिंग म्हणाला की, “आमच्याकडे दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान आहे. ज्याच्यासाठी मागचा हंगाम अप्रतिम राहिला होता. त्याला भारतीय संघातही सामील केले गेले आहे.”

दरम्यान, आयपीएल २०२२ विषयी चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता पाहायला मिळत आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला बीसीसीआयने आयपीएल मेगा लिलाव आयोजित केला आहे. पुढच्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स मेगा लिलावात चांगल्या खेळाडूंंवर बोली लावताना दिसेल. आणि संघ आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.

महत्वाच्या बातम्या –

आयपीएल लिलावातील सर्वात रोमांचक नियम सायलेंट टाय ब्रेकर! जाणून घ्या त्याबद्दल

IPL 2022: केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकता लिलाव, कोणाकडे किती पैसे? जाणून घ्या सर्वकाही

आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ३ खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी, तर १० जणांवर करडी नजर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---