मुंबई । आंद्रे रसेलचे नाव येताच त्याचे मोठमोठे षटकार डोळ्यासमोर येतात. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आंद्रे रसेल करत असतो. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणार्या या फलंदाजाबाबत त्यांच्या संघातील एका युवा खेळाडूने महत्त्वपूर्ण विधान केले आहे. रिंकू सिंगने सांगितले की, आंद्रे रसेलच्या बरोबरीचे फटके कोणीच खेळू शकत नाही. ती त्याची ताकद आहे.
केकेआरच्या संकेतस्थळावर दिलेल्या मुलाखतीत रिंकू सिंह सांगितले की, आंद्रे रसेलकडे खूपच शक्ती आहे. तो म्हणाला, ”त्याच्यासारखा चेंडू मारणारा कोणताही फलंदाज नाही. त्याचे षटकार गगनचुंबी आहेत आणि मला त्याच्यासारखा स्पर्धेत दुसरा कोणताही फलंदाज दिसत नाही. सध्या तो जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. माझे इंग्रजी चांगले नाही, म्हणून मी त्याच्याशी जास्त बोललो नाही. पण शेवटच्या वेळी त्याच्या वाढदिवसाच्या वेळी त्याच्या खोलीत खूप मजा आली.”
गेल्या वर्षी आंद्रे रसेल प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरला
गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी केली. 14 सामन्यांत त्याने 205 च्या स्ट्राइक रेटने 510 धावा केल्या. केकेआर संघाला फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही तो चांगला ठरला होता. त्याने 11 बळी घेतले. यावेळीसुद्धा त्याच्या संघाला रसेलकडून मोठ्या अपेक्षा असतील.
“रसेलचे षटकार उंच असतात. त्यामुळे कदाचित युएईमधील मैदानाचा त्याला त्रास होणार नाही. फटका मारण्याची वेळ चुकीची असेल तरच त्यांना बाद केले जाईल. चेंडू बॅटवर आल्यानंतर तो थेट धावांनी मैदानाच्या बाहेर मारतो. यावेळी त्याची बॅट कशी कामगिरी करते ते पहावे लागेल,” असेही रिंकू सिंगने सांगितले. केकेआरच्या संघाने दोनदा जेतेपद जिंकले आहे, परंतु दोन्ही वेळा गौतम गंभीरच्या नेतृत्वात टीम जिंकली.