मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबई येथे आयपीएल २०२०चा अंतिम सामना झाला. या महत्त्वपूर्ण अशा सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत २० षटकात १५६ धावा केल्या. दरम्यान पूर्ण हंगामात ज्याची फलंदाजी सुमार राहिली, त्यानेच संघासाठी मोलाचे योगदान दिले. हा फलंदाज म्हणजे, दिल्लीचा यष्टीरक्षक रिषभ पंत होय.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने पंतच्या मागील कामगिरीला दुर्लक्षित करत अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान दिले होते. पंतनेही संधीला दोन्ही हातांनी घट्ट पकडत अर्धशतकी खेळी केली. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत फक्त ३८ चेंडूत ५६ धावांची आक्रमक खेळी केली. दरम्यान त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले.
महत्त्वाचे म्हणजे, पंतचे हे आयपीएल २०२०मधील पहिलेच अर्धशतक होते. यापुर्वीच्या सामन्यात त्याला एकदाही ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.
अगदी पंतप्रमाणे आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ फलंदाजांनवरही ही परिस्थिती उद्भवली होती. २०१२ साली सुरेश रैना आणि मनविंदर बिस्ला व २०१४ साली मनन वोहरा यांच्यावर अशी वेळ आली होती. या तिन्ही खेळाडूंना पूर्ण हंगामात एकही अर्धशतक लगावला आले नव्हते. तरीही त्यांच्या संघ कर्णधारांनी अंतिम सामन्यात त्यांना संधी दिली आणि या पठ्ठ्यांनी ५० किंवा त्यापेक्षा धावा करत गोड शेवट केला.
महत्त्वाच्या बातम्या-
एकच फाईट वातावरण टाईट! आयपीएल फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा अय्यर ‘या’ यादीत थेट दुसऱ्या स्थानी
फायनलमध्ये अर्धशतकासह कर्णधार अय्यर ठरला दिल्लीसाठी ‘श्रेयस’, नवा विक्रमही केलाय नावावर
IPL FINAL: बोल्टची चमक! हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेत ‘या’ दिग्गजांची केली बरोबरी