भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली असून, मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. ही मालिका सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने दौऱ्यातून माघार घेतली होती. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पंत मेडिकल स्टाफच्या सल्ल्याने वनडे मालिकेतून बाहेर होत असल्याचे सांगितले होते. मात्र, याच प्रकरणावर आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी पंतचा भारतीय संघात समावेश केला गेला होत. न्यूझीलंडवरून तो थेट बांगलादेशला दाखलही झालेला. त्याने संघाच्या सराव सत्रातही सहभाग नोंदवलेला. मात्र, पहिल्या सामन्याच्या काही तास आधी तो भारतात परतत असल्याची बातमी समोर आली होती. बीसीसीआयने आपल्या निवेदनात तो डॉक्टरांशी चर्चा करून भारतात जाणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी कसोटी मालिका आधी तो पुन्हा संघात सहभागी होईल असे देखील या निवेदनात म्हटले गेले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतला कोणताही आरोग्यविषयक त्रास नसून, तो स्वतःच्या मर्जीने संघातून बाहेर झाला आहे. त्याने सामन्याच्या सकाळी कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांना याबाबतची कल्पना दिली होती. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे पहिल्या सामन्यात केएल राहुल याला यष्टीरक्षण करावे लागले.
पंत मागील काही काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरतोय. टी20 विश्वचषकानंतर झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावरही तो धावांसाठी झगडताना दिसला होता.
(Rishabh Pant Request Rohit And Dravid For Releasing Him From Team Ahead Bangladesh ODI Series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय संघाकडून सुट्टी मिळाली असताना सूर्यकुमार डॉमेस्टिकमध्ये करणार धमाका, एमसीए अधिकाऱ्याची माहिती
विश्वचषकासाठी ‘हा’ खेळाडू प्रबळ दावेदार, दिनेश कार्तिकने व्यक्त केले मत