भारत विरूद्ध बांगलादेश 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh pant) शानदार शतक झळकावले. तत्पूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बालने पंतबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला की, पंत यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनेल.
तमीम इक्बाल (Tamim Iqbal) म्हणाला, “मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके करणारा रिषभ पंत फलंदाज ठरेल.” तर भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल (Parthiv Patel) म्हणाला की, “पंत त्याच्या कारकिर्दीत 20 पेक्षा जास्त शतके झळकावणार आहे.” भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावण्यात पंतने याआधीच एमएस धोनीची बरोबरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा रेकाॅर्ड सध्या ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे. गिलख्रिस्टने आपल्या कारकिर्दीत एकूण 17 शतके झळकावली. दुसऱ्या स्थानावर झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर असून त्याने 12 शतके झळकावली होती. भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा यष्टीरक्षक एमएस धोनी होता, परंतु पंतने आधीच त्याची बरोबरी केली आहे.
पंतच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 33 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 56 डावात फलंदाजी करताना 2,271 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 6 कसोटी शतके झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडसाठी 200 वनडे विकेट घेणार पहिला फिरकीपटू, 36 वर्षीय दिग्गजाची ऐतिहासिक कामगिरी
क्रिकेटच्या मैदानावरील वादाला हिंसक वळण, खेळाडूंनी एकमेकांना बॅटने केली मारहाण – Video
मस्ती नाही थांबली पाहिजे..! कसोटी सामन्यादरम्यान विराटची पंच रिचर्डसोबत मस्ती- Video