बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सने 3 धावा राखून विजय मिळवला. रविचंद्रन अश्विन याने राजस्थानसाठी चमकदार प्रदर्शन केले आणि सामनावीर देखील ठरला. सामना संपल्यानंतर रविचंद्रन अस्विन माध्यमांसमोर आला आणि त्याने मैदानी पंचांच्या एका निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. पंचांनी राजस्थानच्या गोलंदाजीवेळी संघाने मागणी न करता चेंडू बदलला होता, जे अश्विनला खटकले.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) यांच्यातील हा सामना बुधवारी रात्री चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. सीएसकेचे होम ग्राउंड असलेल्या या मैदानात रात्रीच्या वेळी दव मोठ्या प्रमाणात होते. याच कारणास्तव राजस्थानच्या गोलंदाजीवेळी पंचांना डाव्याच्या मध्यात चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. टी-20 सामन्यांमध्ये प्रत्येक डावात नवीन चेंडू वापरला जातो. पण बुधवारी चेपॉक स्टेडियमवर दव असल्यामुले राजस्थानच्या डावात चेंडू लवकर ओला झाला आणि पंचांची नवीन चेंडू घेतला.
याविषयी माध्यमांसमोर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने आपले मत मांडले. अश्विन म्हणाला, “मैदानात दव असल्यामुळे पंचांनी मध्येच चेंडू बदलल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटले. याआधी असे होताना मी कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे मी आश्चर्यचकित आहे. या आयपीएल हंगामात पंचांच्या काही निर्णयांमुळे मला त्रास झाला आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर यातील काही निर्णय चांगले होते, तर काही खराब होते. या निर्णयांमध्ये संतुलन असले पाहिजे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नाते आम्ही चेंडू बदलण्याची मागणी केलीच नव्हती. पण पंचांनी आपल्या मनानेच निर्णय घेतला. मी पंचांना याचे कारण विचारले. ते म्हणाले, आम्ही असा निर्णय घेऊ शकतो.”
“आता मला अपेक्षा एवढीच आहे की, जेव्हा कधी मैदानात दव पडेल, तेव्हा पंच चेंडू बदलू शकतील. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात त्यांनी असाच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही काहीही करा, पण एक स्टॅन्डर्ड काय ठेवला पाहिजे,” असे अश्विन पुढे म्हणाला. अश्विनच्या या सामन्यातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने फलंदाजाच्या रूपात 30 धावा केल्या. तर गोलंदाजाच्या रूपात अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्या महत्वापूर्ण विकेट्स घेतल्या. (Rivachandran Ashwin is upset with the decision of the umpires)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचे अभिनंदन! यॉर्कर टाकून राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्माची पोस्ट व्हायरल
‘धोनी होता म्हणून…,’ सीएसकेला हरवल्यानंतर संदीप शर्माची सीएसके कर्णधाराविषयी काय म्हणाला