विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा ही भारतीय क्रिकेटमधील २ मोठी नावे आहेत. दोघांनाही जगातील मातब्बर फलंदाजांमध्ये गणले जाते. परंतु त्या दोघांचे एकमेकांसोबत जास्त जमत नसल्याच्याही चर्चा होत असतात. सध्या हे दोन्ही भारतीय क्रिकेटपटू मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठी (T20 Series) तयारी करत आहेत. १६ फेब्रुवारीपासून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. तत्पूर्वी पहिल्या टी२० सामन्याच्या पूर्वसंध्येला (१५ फेब्रुवारी) कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) पत्रकार परिषदेत विराटची बाजू मांडताना (Captain Rohit On Virat’s Form) दिसला.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली बऱ्याच महिन्यांपासून लौकिसास साजेशे प्रदर्शन करताना दिसत नाहीये. मायदेशातील मैदानांवरही त्याला सूर गवसत नाहीये. याबाबत मंगळवार रोजी झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत (Rohit Sharma Press Conference) एका पत्रकाराने रोहितला प्रश्न विचारला असताना तो म्हणाला की, “मला वाटते की, याची सुरुवात तुम्हा लोकांपासून (मीडिया) होते. जर तुम्ही लोक काही काळ शांत राहिलात, तर विराट कोहली निश्चितच चांगले प्रदर्शन करेल.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “तो मानसिकदृष्ट्या खूप स्थिर खेळाडू आहे. तो एका दशकापेक्षा जास्त काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग आहे. जेव्हा कोणता खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या काळापासून क्रिकेटमध्ये असतो, तेव्हा त्याला दबावतही स्थितीला कसे सांभाळायचे याची जाण असते. मला वाटते की, हे सगळे तुमच्यापासूनच सुरू होते. जर तुम्ही थोडी शांती ठेवली तर सर्वकाही ठीक होईल.”
विराट कोहलीला आत्मविश्वासाची गरज आहे का या प्रश्नावर रोहित म्हणाला की, “मला वाटते की, शतक न करू शकणे ही वेगळी गोष्ट आहे. पण आपण हे विसरायला नको की, त्याने दक्षिण आफ्रिकेत एक मालिका खेळली आणि त्यातील ३ सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये अर्धशतक केले होते. मला त्याच्या फॉर्ममध्ये काहीही चुकीचे दिसत नाही आणि संघ व्यवस्थापनालाही याच्याशी कसलीही तक्रार नाही.”
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील टी२० मालिका १६ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. तर दुसरा सामना १८ फेब्रुवारी आणि तिसरा सामना २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. हे सर्व सामने कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: मुंबईसह ‘या’ दोन संघांचे गोलंदाजी आक्रमण मानले जातेय ‘बेस्ट’
‘तो चांगेल प्रदर्शन करेल, पण…’, पंतने सलामीला फलंदाजी करण्याबद्दल प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रिया