सध्या आयपीएल स्पर्धेचा 18 वा हंगाम सुरू आहे. तसेच सध्या सर्व संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तत्पूर्वी मुंबई इंडियन्स संघासाठी प्लेऑफची वाट थोडी खडतर असणार आहे. मुंबईची या हंगामामध्ये सुरुवात चांगली झाली नाही. तसेच मुंबईसाठी निराशेची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा अजूनही चाहत्यांच्या आशांवर खरा उतरला नाही. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली नाही. रोहित शर्माच्या आयपीएल करिअरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने खेळलेल्या 262 सामन्यात 6684 धावा केल्या आहेत.
आता रोहितबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मुंबई टी-20 सीझन 3 मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माला लीगचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. ज्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाला 5 ट्रॉफी जिंकून दिलेल्या आहेत. चाहत्यांची आशा आहे की, रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार व्हावा. रोहित शर्माला गेल्या हंगामात कर्णधार पदावरून हटवण्यात आले होते. तसेच मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली होती.
महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या मुंबईचे हंगामातील 7 सामने उरलेले आहेत. त्यामधील त्यांना किमान 6 सामने जिंकणे गरजेचे आहे. मुंबईने आत्तापर्यंत झालेल्या 7 सामन्यांमध्ये फक्त 3 सामने जिंकलेले आहेत. तसेच 4 सामन्यांत पराभव पत्करलेला आहे.