ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या पराभवानंतर भारतीय संघाने मेलबर्न येथील दुसर्या कसोटीत कौतुकास्पद पुनरागमन केले. या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेने केले. या सामन्यात नवोदित खेळाडूंनी सुद्धा प्रशंसनीय कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने विजय प्राप्त केला. या विजयानंतर भारतीय संघाचे महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी भारतीय संघातील खेळाडूंचे कौतुक केले आहे.
सचिन तेंडुलकर म्हणाले, ज्या प्रकारे अजिंक्य रहाणेने कठीण परिस्थितीत शतकी खेळी केली आणि भारतीय संघाला स्थैर्य निर्माण करून दिले, ती कामगिरी उल्लेखनीय होती. प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे बरोबर वेगवान गोलंदाजांची कमान सांभाळणार्या जसप्रीत बुमराहची देखील सचिन यांनी प्रशंसा केली. त्याचबरोबर या सामन्यातून भारतीय कसोटी संघात पदार्पण केलेल्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचे सचिन यांनी विशेष कौतुक केले.
सचिन तेंडुलकर म्हणाले, “मला वाटते आपल्या संघाचे प्रदर्शन शानदार होते. ज्याप्रकारे आपला संघाने खेळ केला, तसेच अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व ज्याप्रकारे केले ते चांगले होते. त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडू आणि त्यांची कामगिरी खूपच चांगली होती.” अजिंक्य रहाणेच्या शतकीय खेळीबद्दल बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले, “मला वाटते अजिंक्यने शानदार फलंदाजी केली. तो शांतचित्त होता. त्याची पद्धत आक्रमक होती. परंतु धैर्यच्या सोबतीला आक्रमतेचे मिश्रण होते. ”
जसप्रीत बुमराह एक चॅम्पियन गोलंदाज आहे – तेंडुलकर
विजयात वेगवान गोलंदाजाच्या योगदानाबद्दल सचिन तेंडुलकर म्हणाले, “वेगवान गोलंदाजी विभागात बुमराहने आक्रमणाची अधिक जबाबदारी घेतली. जेव्हा खेळाडू निराश होते, तेव्हा कठोर गोलंदाजी केली. हे चॅम्पियन गोलंदाजाचे संकेत आहेत.”
सचिन तेंडुलकर यांनी सिराज आणि गिलची प्रशंसा केली
या सामन्यात पहिल्या डावात 45 आणि दुसऱ्या डावात नाबाद 35 धावा करणार्या गिलबद्दल सचिन म्हणाले, “गिल आत्मविश्वासाने भरलेला आणि साहसी दिसला. त्याने ऑस्ट्रेलियात गोलंदाजाच्या शॉर्ट पीच चेंडूवर काही चांगले शॉट मारले. टॉप ऑर्डरमध्ये 45 आणि 35 धावांची खेळी करणे म्हणजे निश्चितपणे चांगली सुरुवात आहे.”
त्यानंतर सिराजच्या गोलंदाजीबद्दल बोलतांना सचिन म्हणाले, “सिराजच्या गोलंदाजीला विसरू नका. असे वाटले नाही की तो पहिला कसोटी खेळतोय. त्याने ज्याप्रकारे पहिले षटक टाकले, त्यानंतर हळू हळू सुधारणा केली. परंतु असे कधीच वाटले नाही की तो पहिला सामना खेळत आहे. त्याने रणनिती आखली होती आणि त्यानुसार चांगल्या पद्धतीने त्यावर अवलंब केला. पदार्पण करणारे दोन्ही खेळाडू रणनिती बनवून खेळताना दिसले. ”
भारताच्या मधल्या फळीने विजय मिळवून दिला : तेंडुलकर
सचिन तेंडुलकर यांच्या मते भारतीय संघाला मधल्या आणि खालच्या फळीतील खेळाडूंनी विजय मिळवून दिला. तेंडुलकर म्हणाले,” जडेजाने चांगली फलंदाजी केली. आपण पाच गोलंदाजाबद्दल बोलतो. मात्र सहाव्या क्रमांकाचा पंत, सातव्या जडेजा आणि आठवा चार शतक लगावलेला अश्विन यांची खूप मदत झाली. त्यापैकी अजिंक्य आणि जडेजाची भागिदारी महत्वाची होती. यामुळे ऑस्ट्रेलिया संघावर दडपण आले”
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानावर शिवी देणं ‘या’ ऑसी क्रिकेटरला पडलं महागात, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठोठावला २५०० डॉलर्सचा दंड
अजिंक्य रहाणे म्हणतो, भारतीय संघासाठी ‘ही’ गोष्ट म्हणजे सर्वात मोठे बक्षीस
इंजिन पळण्यासाठी सज्ज! रोहित शर्माचा सराव करतानाचा फोटो बीसीसीआयने केला शेअर