नुकतेच आशिया चषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे आता यासाठी संघनिवडीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. अशातच भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहील सध्या खराब फॉर्मसोबत झुंज देत आहे. अशा परिस्थितीत त्याने जास्तीत जास्त सामने खेळायला पाहिजे असे विधान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी केले आहे.
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना वाटते की विराट कोहलीला विश्रांती देण्याऐवजी त्याने खेळावे कारण यामुळे स्टार फलंदाजाला पुन्हा फॉर्ममध्ये येण्यास मदत होईल. कोहलीने नोव्हेंबर २०१९पासून एकही शतक झळकावलेले नाही. या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागला आणि नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यातही तो फलंदाजीत फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याच्या अलीकडच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे.
तो म्हणाला की, “मला वाटतं, विराटला कोणत्याही फॉरमॅटमध्ये ब्रेक मिळतो, त्याला प्रत्येक संधी द्यायला हवी होती. लोक म्हणतात की त्याने थोडा ब्रेक घ्यावा आणि त्याने ब्रेक घेतला आहे. गेल्या दोन वर्षांवर नजर टाकली तर, त्यामुळे त्याने ब्रेक घेतला आहे. बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल नाही. त्याने विराट कोहलीशी संवाद साधला असेल, पण माझे वैयक्तिक मत आहे की तो जितका जास्त खेळेल तितके त्याच्यासाठी चांगले.”
तो पुढे म्हणाला की, “भुवनेश्वर कुमारने स्पष्टपणे सांगितले आहे की, अनेक खेळाडूंप्रमाणे, जेव्हा तुम्ही अशा टप्प्यातून जात असाल, तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सामना खेळणे.” प्रख्यात समालोचक मांजरेकर यांनी भुवनेश्वर कुमारचे उदाहरण देखील दिले, ज्याने नेत्रदीपक पुनरागमन केले आहे आणि प्रत्येक सामन्यात तो चांगला होत आहे.
दरम्यान, अनेक दिग्गजांच्या मते कोहलीने आता विश्रांतीचा पर्याय बाजूला सारत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी मैदानात उतरायला हवे. त्याच्या चांगल्या प्रदर्शनाची त्याच्याप्रमाणे संघालाही आवश्यकता आहे. शिवाय जाहीर झालेला आशिया चषक आणि आगामी टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी विराट कोहली भारतासाठी सर्वात महत्वाचा दुवा असणार आहे. त्यामुळे त्याने भारतीय संघात जास्तीत जास्त सामने खेळावे अशी ईच्छा अनेक क्रिकेट जाणकारंकडूनही व्यक्त केली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
CWG 2022। उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडिया सज्ज! फक्त करावी लागेल ‘ही’ एक कामगिरी
सर्वत्र सूर्या! एका दमदार खेळीने केले अनेक ‘रेकॉर्ड ब्रेक’
पुन्हा उगवला भारताच्या विजयाचा सूर्य! तिसरा सामना सहज खिशात; सूर्यकुमारची अफलातून खेळी