जेव्हापासून भारतात क्रिकेट सुरू झाले तेव्हापासून भारतीय फलंदाजांचे तंत्र पाहण्यासारखे आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत असे अनेक फलंदाज होऊन गेले जे तांत्रिकदृष्ट्या जगातील महान फलंदाजांपैकी एक होते. जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघातील महान फलंदाजांचा विचार केला जातो तेव्हा माजी कर्णधार सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांची नावे घेतली जातात, ज्यांच्या फलंदाजीच्या तंत्राने जगाने सलाम केला आहे. या खेळाडूंनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर नाव कमावले.
त्याच वेळी असे काही फलंदाज होते ज्यांचे तंत्र या खेळाडूंसारखेच होते. परंतु त्यांची कारकीर्द तितकी बहरली नाही. आज आपण अशाच एका भारतीय फलंदाजाबद्दल बोलणार आहोत, जो भारतीय क्रिकेटचा दुसरा सुनील गावसकर मानला जात होता पण त्याची कारकीर्द जास्त काळ टिकू शकली नाही.
पण आपल्या फलंदाजीच्या तंत्राने त्याने बरेच नाव कमावले होते. जो सध्या जगातला प्रसिद्ध समालोचक बनला आहे. तो खेळाडू म्हणजे संजय मांजरेकर. ते एक कौशल्यपूर्ण खेळाडू होते. अलीकडेच संजय मांजरेकर यांनी त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा केला.
1987 मध्ये त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. संजय मांजरेकरांनी त्याच्या पदार्पण मालिकेत काही खास केले नाही परंतु यावेळी त्यांनी आपल्या फलंदाजीच्या तंत्राचा नमुना दाखविला.
1989 मध्ये जेव्हा भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौर्यावर गेला तेव्हा तेथे त्यांनी ब्रिजटाऊनच्या मैदानावर 108 धावा केल्या आणि त्यांची क्षमता सिद्ध केली. या दौऱ्यावर संजय मांजरेकरांची कामगिरी चांगली होती आणि त्यामुळे वेस्ट इंडिज संघाचा फलंदाज सर विव्हियन रिचर्ड्सने त्याचे नाव भारताचे पुढचे सुनील गावसकर असे ठेवले.
संजय मांजरेकर यांचे कौतुक करताना रिचर्ड्स म्हणाले होते की, ‘भारताला संजयच्या रुपाने गावसकर सापडला आहे. त्याच्याकडे सर्व काही आहे. उत्कृष्ट तंत्र, धैर्य आणि निर्धार. ‘
या दौऱ्यावरील संजय मांजरेकर यांची कामगिरी खूप प्रभावी होती. वेस्ट इंडीज दौर्यायानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच 1992 मध्ये झिम्बाब्वेसारख्या दुर्बल संघाविरुद्ध खेळला होता. झिम्बाब्वेच्या संघाने शानदार फलंदाजी करताना भारतासमोर 456 धावा केल्या आणि धावांचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीच्या विकेट गमावल्या. पण त्यानंतर संजय मांजरेकर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आले आणि या अडचणीतून संघाला बाहेर खेचले.
खेळपट्टीवर 9 तास मॅरेथॉन डाव खेळत असलेल्या संजय मांजरेकरने 422 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या. यानंतर संजय मांजरेकरनेही पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत चमत्कार केले आणि 4 कसोटी सामन्यात 2 शतके आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 569 धावा केल्या. यानंतर त्याचे संघातील महत्त्व आणखी वाढले.
पण मांजरेकरांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. परंतु तरीही, 1996 पर्यंत तो भारतीय संघाकडून खेळत राहिला. त्यानंतर भारतीय संघात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडच्या रूपात दोन महान खेळाडू संघात आले होते, त्यानंतर मात्र मांजरेकरांना बाहेर बसावे लागले. संजय मांजरेकरांची कारकिर्द केवळ अवघ्या ३७ कसोटी सामन्यांनंतर संपली. मांजरेकरांनी 37 कसोटी सामन्यात 4343 धावा आणि 74 वनडे सामन्यात 1994 धावा केल्या.