पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम वनडे क्रिकेटमधील त्याच्या क्लासिकल शैलीतील फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र आजच्या काळात त्याची ही शैली आउटडेटेड होत चालली आहे. बाबरचा वनडेतील स्ट्राईक रेट 88 आहे, जो आजकाल पुरेसा मानला जात नाही. तर टी20 मध्ये त्याचा स्ट्राईक रेट अवघा 129 आहे. यामुळे त्याच्यावर अनेकदा टीका देखील केली जाते.
सध्या पाकिस्तानात चॅम्पियन्स वनडे कप खेळला जात आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात बाबरनं सुरुवातीच्या काही षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. मात्र नंतर त्याचा वेग कमी होत गेला. एकवेळ तो 10 चेंडूत 13 धावा करून खेळत होता. मात्र पुढच्या 22 चेंडूत तो 10 धावाच करू शकला, ज्यामुळे त्याच्या संघाची स्थिती बिघडत गेली.
बाबर आझमच्या या खेळीदरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्पर्धेतील विरोधी खेळाडू सरफराज अहमद यानं त्याच्या स्ट्राईक रेटची खिल्ली उडवली. त्यानं गमतीत म्हटलं की, गोलंदाजांनी बाबर आझमला आऊट करू नये. त्याला 40 षटकांपर्यंत क्रिजवर खेळू द्यावं. सरफराज म्हणाला, “घाई नाही, घाई नाही. फक्त त्यांना बाबर-बाबर करायला सांगा. आपण बाबरला 40 ओव्हर खेळवू”
Sarfaraz Ahmad trolling Babar Azam:
” isy 40 overs tk khelnay do , isy out nai krna”Even Saifi bhai knows Babar Azam is a selfish player & whenever he scores runs , his team often lost the game.#ChampionsCup
— Cric mate (@matecric07) September 19, 2024
बाबर आझमसाठी चालू वर्ष खूप खराब राहिलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यानंतर पाकिस्तान 2024 टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेज मधूनच बाहेर पडला. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची बॅट काही कमाल करू शकली नाही. तो 2 कसोटीच्या 4 डावांमध्ये केवळ 64 धावा करू शकला. यामुळे तो आयसीसी टॉप 10 रँकिंगमधून देखील बाहेर पडला आहे.
हेही वाचा –
संजू सॅमसनचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, शतक झळकावून ठोकला कसोटी संघासाठी दावा
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवशी रविचंद्रन अश्विनने रचले अनेक विक्रम, वर्षानुवर्षे तोडणे कठीण
बांगलादेशने स्वत:च भारताला दिली पुनरागमनाची संधी, माजी सलामीवीराने सांगितली कुठे झाली चूक?