वनडे विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. हा पराभव पचवण्यासाठी भारतीय चाहत्यांना नक्कीच मोठा काळ जावू द्यावा लागेल. पण संघ दुखःत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना भेटले. मोदींचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या देखील मोढी आहे. मोदीसोबत बोलताना खेळाडूंना अस्वस्थ वाटत होते, असा आरोप विरोधी पक्षाकडून केला गेला आहे.
वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला 6 विकेट्सने पारभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलिया इतिहिसात सहाव्यांदा विश्वचषक जिंकणारा संघ ठरला. वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ड्रेविस हेड याच्यासह संघातील इतर काही खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी मॅच विनर ठरले. दुसरीकडे रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या खेळीव्यतिरिक्त इतर खेळाडू भारतासाठी महत्वाचे योगदान देऊ शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अहदमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित हेत. पराभवानंतर त्यांनी थेट भारताच्या ड्रेसिंग रुमकडे धाव घेतली.
PM Narendra Modi with Virat Kohli, Rohit Sharma and team India after the defeat. pic.twitter.com/cFgkEksQ3p
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 21, 2023
भारतीय संघ दुखःत असताना मोदींनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडिया तुफान व्हायर देखील झाला. असे असले तरी, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या आणि राज्य सभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींच्या या व्हिडिओवर टीका केली. आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून त्यांनी पोस्ट केली की, “भारतीय खेळाडू अस्वस्थ असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ते पराभवाचा सामना करत असताना मोदींसह व्हिडिओ कॅमेरे ड्रेसिंग रुममध्ये येतात.” प्रियांका यांच्या ट्या ट्वीटवर प्रतिक्रियाचां अक्षसशः पाऊस पडला आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे मत पाहायला मिळत आहेत.
The Indian cricketers clearly look uncomfortable, having to deal with the loss and then have cameras thrust on them inside the dressing room for PMs team to record ‘pep talk’ .
Yeah you can troll this tweet as much as you’ll want.— Priyanka Chaturvedi???????? (@priyankac19) November 21, 2023
दरम्यान, अंतिम सामन्यानंतर मोदी थेट ड्रेसिंग रुममध्ये गेल्यामुळे चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 43 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. (Shiv Sena leader Priyanga Chaturvedi criticized Narendra Modi’s video from team india’s dressing)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषक पराभवानंतर सौरव गांगुलीकडे मोठी जबाबदारी, करणार ‘हे’ काम
संजू सॅमसन-चहलला संधी का मिळाली नाही? दिग्गज नेत्याने विचारला बीसीसीआयला प्रश्न