आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला जात होता. मात्र, भारतीय संघाने जोरदार सुरुवात केल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने दिवसाचा पुढील खेळ होऊ शकला नाही. अखेर हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (11 सप्टेंबर) खेळला जाईल. त्याचवेळी पहिल्या दिवसाच्या या खेळावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याची प्रतिक्रिया आली आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी केली. मात्र, अर्धशतके केल्यानंतर ते बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव पुढे नेला. मात्र, त्यानंतर पाऊस आला आणि पुढे खेळ होऊ शकला नाही. सामना रात्री 9 वाजता सुरू होऊन 34-34 षटकांचा खेळ होणार होता. परंतु पुन्हा एकदा पाऊस पडला आणि सामना राखीव दिवशी गेला.
या पहिल्या दिवशीच्या खेळावर प्रतिक्रिया देताना अख्तर म्हणाला,
“आजच्या सामन्यात पाकिस्तानची अवस्था खराब होती. पावसाने आम्हाला वाचवलं. पहिल्या सामन्यात देखील भारतीय संघ अडचणीत असतानाच पाऊस त्यांच्या मदतीला धावून आला होता.”
उभय संघादरम्यान साखळीत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 266 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पाऊस आल्याने पाकिस्तानचा डाव खेळला गेला नाही. परिणामी, सामना रद्द करण्यात आला श्रीलंकेत पावसाळा असताना या स्पर्धेचे आयोजन केल्याने अनेक जण आयोजकांवर टीका करत आहे.
(Shoaib Akhtar Speaks On Rain In Match Between India And Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
आशिया कपमध्ये पाऊस आणि ट्रोल होतायेत जय शाह! काय आहे कारण?