भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी (29 नोव्हेंबर) मोठी घोषणा केली. राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यात आले. बीसीसीआय संघाच्या सपोर्ट स्टाफविषयी काय निर्णय घेणार, असा प्रश्न चाहत्यांना मागच्या काही दिवसांपासून पडला होता. बुधवारी अखेर या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळाले. या निर्णयानंतर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी खास प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघ 2021 टी-20 विश्वचषकात पराभूत झाल्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला. शास्त्री यांनी या पदासाठी पुन्हा अर्ज न केल्यामुळे राहुल द्रविड (Rahul Dravid) हा संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनला. द्रविडच्या मार्गदर्शनात मागच्या दोन वर्षांपासून संघ खेळत आहे. नुकताच वनडे विश्वचषक पार पडला. अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पारभव स्वीकारावा लागला. राहुल द्रविडसाठीही संघासोबत ही शेवटची मालिका होती. पण आता बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडचा कार्यकाळ वाढवला आहे.
द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदी कायन ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर बीसीसीआय सचिव जय (Jay Shah) शाह म्हणाले, “राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. संघासोबत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि अतुलनीय बांधिलकली दाखवली. आमचे विश्वचषक अभियाने एखाद्या विलक्षण कामगिरीपेक्षा कमी नव्हते. चांगल्या प्रदर्शनासाठी संघाला व्यासपीठ तयार करून दिल्याबमुळे तो कौतुकास पात्र आहे.”
दरम्यान, द्रविड याच्या मार्गदर्शनात बारातने सुरुवातीच्या काळात सुमार प्रदर्शन केले होते. पण विश्वचषक अभियानात द्रविडने आपली गुणवत्ता दाखवून दिली. स्पर्धेत सुरुवातीच्या 10 पैकी 10 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. पण अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला. 10 विजयांनंतर मागे थांबणारा द्रविड अंतिम सामन्यातील पराभवानंतर माध्यमांसमोर आला होता. द्रविडने पराभवाची जबाबदारी घेतल्यामुळेही जाणकारांकडून त्याचे कौतुक केले गेले. (Special reaction of BCCI Secretary Jai Shah after retaining Rahul Dravid as head coach)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केलेल्या ऋतुराजबद्दल माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘उलट त्याला स्वातंत्र्य…’
पर्याय नाही म्हणून द्रविड! आगामी टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा होता वेगळाच प्लॅन