रविवारी (२९ जुलै) झालेल्या गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने अमेरिकेला १-१ असे बरोबरीत रोखत विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे.
आता बाद फेरीत, महिला हॉकी क्रमवारीत १० व्या स्थानी असलेल्या भारतीय संघाची १७ व्या स्थानी असलेल्या दुबळ्या इटलीशी मंळवारी (३१ जुलै) गाठ पडणार आहे.
गट फेरीत भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली नसली तरी बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुरेशी ठरली आहे.
भारताचा गट फेरीतील पहिला सामन्या इंग्लंडशी १-१ असा बरोबरीत सुटला. दुसऱ्या सामन्यात भारताला आयर्लंडने १-० ने भारताला पराभूत केले होते. तर गट फेररीतील अमेरिकेशी झालेला तिसरा सामना भारताने १-१ असा अनिर्णित राखला.
या सामन्यापूर्वी भारताची कर्णधार राणी रामपालने भारतीय संघ पूर्ण क्षमतेने खेळ करत या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे असे सांगितले.
“सर्वांना माहित आहे की आम्ही हा सामना अनिर्णित जरी राखला तरी आमचे पुढील फेरीतील स्थान पक्के आहे. तरीही या सामन्यात आम्ही विजय मिळवण्याच्या इराद्याने उतरणार आहोत. असे राणी रामपाल म्हणाली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-