इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 33 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या हंगामात आतापर्यंत चाहत्यांच्या आशांवर खऱ्या उतरल्या नाहीत. तसेच दोन्ही संघ पॉइंट्स टेबलवर खालच्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यामुळेच हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही संघ फलंदाजीच्या बाबतीत अतिशय अग्रेसर आहेत, त्यामुळेच या सामन्यात मोठी धावसंख्या पहायला मिळू शकते. आज हे पाहणे महत्त्वाचे असेल की, आयपीएलमध्ये पहिल्यांदा 300 धावसंख्या पार होईल का?
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळायला सहा सामन्यात फक्त दोन सामने जिंकले आहेत, तसेच चार सामन्यांमध्ये पराभव पत्करलेला आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाची अवस्था देखील तशीच आहे. त्यांनी सुद्धा सामन्यात फक्त दोन सामन्यात जिंकले आहेत. त्यामुळेच हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. मुंबईने त्यांच्या मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केले होते, तसेच हैदराबादने पंजाब किंग्सला 8 विकेट्सने हरवले होते.
आजच्या सामन्यात काही खेळाडूंवर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत. मुंबईकडून सर्वात जास्त आशा सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर असतील. ज्यांनी मागच्या सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन केल आहे. रोहित शर्मा कधी फॉर्ममध्ये येणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास, जसप्रीत बुमराहला त्याच्या जुन्या लयीमध्ये येण्याची गरज आहे.
हैदराबादच्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास पंजाब किंग्स विरुद्ध हैदराबादच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली होती. अभिषेक शर्माने शानदार 141 धावांची पारी खेळली होती. त्याचबरोबर आजच्या सामन्यात ईशान किशनवर देखील चाहत्यांच्या नजरा असतील. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टी बद्दल बोलायचे झाल्यास, येथे फलंदाजांना फायदा मिळतो. हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास तापमान 30 सेल्सिअसच्या पुढे असण्याची शक्यता आहे.