बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे आणखी दोन आठवडे आपल्या पदावर राहणार हे निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय संबंधित असणारे हे प्रकरण तहकूब केले आहे. या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना त्यांच्या पदांवर आणखी काही काळ राहण्याची सवलत मिळाली आहे.
मागील वर्षी संपला होता कार्यकाळ
बीसीसीआय सचिव असलेल्या जय शहा आणि बीसीसीय अध्यक्ष सौरव गांगुली या दोघांच्या पदाचा कार्यकाळ २०२० च्या मध्यात संपला होता. दोघेही त्यांच्या पदावर राहून अजूनही बीसीसीआयचे कामकाज पाहत आहेत. सुप्रीम कोर्टाने याविषयी सुनावणी न घेतल्याने या दोघांना बीसीसीआयचा कारभार पाहण्याची मूकसंमती मिळाली आहे.
टाळली गेली होती सुनावणी
शहा व गांगुली यांचा कार्यकाळ पुढे वाढला जाऊ नये म्हणून केलेल्या याचिकेची पहिली सुनावणी ९ डिसेंबर २०२० रोजी पुढील वर्षापर्यंत ढकलली होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी फेब्रुवारी महिन्यात आणखी एक महिना पुढे ढकलत मार्चपर्यत स्थगित केलेली. मात्र, आता वारंवार नवीन तारखा मिळत असल्याने हे निश्चित झाले आहे की, शहा व गांगुली यांना त्यांच्या पदावर राहण्यास आणखी अवधी मिळाला आहे.
हा आहे नियम
ऑगस्ट २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयामार्फत बीसीसीआयचे संविधान पारित करण्यात आले आहे. तेव्हापासून गांगुली आणि शहा हे कुलिंग पिरेडमध्ये काम करत आहेत. नियमानुसार, बीसीसीआय संबंधित सर्व पदाधिकारी तीन वर्षापेक्षा जास्त काळ कोणत्याही पदावर राहू शकत नाहीत. गांगुली ऑक्टोबर २०१९ पासून बीसीसीआय अध्यक्ष आहे. मात्र, २०१४ पासून तो बंगाल क्रिकेट संघटनेमध्ये पदाधिकारी म्हणून काम पाहत होता. दुसरीकडे, जय शहा हे २००९ पासून क्रिकेट प्रशासनात काम करत आहेत. तेदेखील २०१९ मध्ये बीसीसीआयचे सचिव बनले आहेत. यासोबतच ते सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद देखील भूषवतात.
महत्त्वाच्या बातम्या –
“टायगर पतौडी यांच्या खराब कामगिरीसाठी मला जबाबदार धरले”, शर्मिला टागोर यांनी व्यक्त केली खंत
वाह मानलं चाहर तुला! २०१७ पासून बनलाय पॉवर प्लेचा ‘सुपर किंग’; पाहा ही खास आकडेवारी
याला म्हणतात प्रतिभा! दिपक चाहरच्या भेदक गोलंदाजीने जिंकली सर्वांची मने, पाहा व्हिडिओ