भारतीय संघ सध्या रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर आधी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेे. मात्र, मालिका सुरु होण्याच्या आधीच बांगलादेश संघाला एक मोठा झटका लागला. बांगलादेशचा स्टार गोलंदाज तस्कीन अहमद पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने म्हटलय की त्याच्या बाहेर जाण्याने कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन सुटकेचा नि:श्वास सोडला.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या मते तस्कीन अहमद (Taskin Ahmed) खूप चांगला गोलंदाज आहे आणि लवकर गडी बाद करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, तो पहिल्या सामन्याला मुकणार आहे आणि यामुळे भारताच्या दोन्ही सलामीवीरांचे काम सोपे झाले.
तस्कीन लवकर गडी बाद करण्यासाठी ओळखला जातो- दिनेश कार्तिक
एका माध्यम संस्थेशी बोलताना कार्तिक म्हणाला की, “तस्कीन अहमद हा बांगलादेशचा टॉपचा गोलंदाज आहे आणि टी20 विश्वचषकातही त्याने चांगली गोलंदाजी केलेली. मुस्तफिजुर रेहमान (Mustafizur Rehman) देखील संघाचा भाग आहे, पण तस्कीनला संघात जास्त महत्व दिले जात आहे. तो अवघड परिस्थितीत गोलंदाजी करतो आणि विकेट्स काढण्यात पटाईत आहे. त्याची उणीव बांगलादेश संघाला नक्की भासणार आहे. त्याच्या अनुपस्थतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असणार.”
तस्कीन अहमद भारतीय संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे. पाठीला दुखापत झाल्याने तो पहिला सामना खेळू शकणार नाही. टी20 विश्वचषकात त्याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले होते. त्याने विश्वचषकात खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 8 गडी बाद करत आपल्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. तो संघात नसल्याने बांगलादेश संघाला मोठा झटका बसला आहे. मात्र, बांगलादेश संघ अपेक्षा करेल की तस्कीनने लवकरात लवकर फिट होऊन संघात पुनरागमन करावे.(Taskin Ahmed rolled out from First ODI due to back injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या वनडे मालिकेतून पत्ता कट होताच हळहळला शमी, सोशल मीडियावर झाला व्यक्त
भारतीय क्रिकेटर अन्नापासून वंचित, मलेशियन एअरलाईन्सकडून ‘या’ खेळाडूची गैरसोय