भारत आणि इंग्लंड संघात खेळल्या असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना पूर्णपणे त्यांच्या खात्यात नेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. लीड्स कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 364 धावा करून संघ ऑलआऊट झाला. त्यानंतर आता टीम इंडियाने इंग्लंडसमोर 371 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ह्या मैदानाचा इतिहास पाहिला तर त्यानुसार हे आव्हान खूप अवघड दिसत आहे. लीड्सच्या 126 वर्षांच्या कसोटी इतिहासात एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे अवघड आहे.
चौथ्या दिवशी केएल राहुल (KL Rahul) आणि रिषभ पंतने (Rishbh Pant) शानदार फलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने फिरवलेला आहे. राहुलने 247 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 137 धावा केल्या, तसेच रिषभने 118 धावांची खेळी केली, त्यामध्ये 15 चौकार आणि 3 षटकार झळकावले. दोन्ही फलंदाजांनी 195 धावांची शानदार भागीदारी रचली आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवले आहे.
शुबमन गिल (Shubman gill) या डावामध्ये फक्त 8 धावा करून बाद झाला, पण राहुल आणि रिषभ पंतने संघ सावरला. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात त्यांनी 364 धावा केल्या आणि इंग्लंडला 371 धावांचं आव्हान दिलेल आहे.
टीम इंडियाचे (Team india) नेतृत्व यावेळी युवा कर्णधार गिल सांभाळत आहे. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवून विजयी कर्णधारांच्या यादीमध्ये त्याचं नाव उमटवण्याची त्याच्याकडे शानदार संधी आहे. जर भारताने हा सामना जिंकला, तर गिल अशी कामगिरी करणारा सर्वात युवा कर्णधारांपैकी एक ठरेल.
हेडिंग्ले इतिहासावर नजर टाकल्यास, 371 धावांचं आव्हान पूर्ण करणे खूप अवघड आहे. मागच्या 126 वर्षांमध्ये येथे खेळलेल्या 82 कसोटी सामन्यात फक्त एकदाच एका संघाने 370 पेक्षा जास्त रन चेज केलेला आहे. हा कारनामा ऑस्ट्रेलियाने 1948 मध्ये केला होता, तेव्हा त्यांनी इंग्लंडविरुद्ध 404 धावांचं आव्हान पूर्ण करून विजय मिळवला होता.
भारताने पहिल्या डावात 6 धावांनी आघाडी घेतली होती, त्यामुळे आता इंग्लंडला 371 धावा करायच्या आहेत. सर्व चाहत्यांचे लक्ष या गोष्टीकडे आहे की, गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिला विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेईल का? की इंग्लंड विजय मिळवून इतिहास रचले?