---Advertisement---

भूरर..! आयपीएल लिलावाचा थरार चालू असताना टीम इंडिया सोडणार चेन्नई, होणार अहमदाबादला रवाना

---Advertisement---

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता या मालिकेतील शेवटचे दोन सामने अहमदाबादला होणार आहेत. या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाला अहमदाबादला रवाना व्हावे लागणार आहे. अशात आज (१८ फेब्रुवारी) दुपारी चेन्नईत एकीकडे आयपीएल २०२१ चा मिनी लिलाव चालू असताना दुसरीकडे भारतीय खेळाडू अहमदाबादला जाण्यासाठी निघणार आहेत.

सध्या भारतीय संघ चेन्नईत असून २४ फेब्रुवारीपासून त्यांना इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळायचा आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असल्याने त्यांना एक आठवड्यापुर्वीच तिथे पोहोचावे लागणार आहे.

अहमदाबाद कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर
या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा १७ जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहलीच करणार असून, अजिंक्य रहाणे उपकर्णधार असणार आहे. याशिवाय रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारास शुबमन गिल हे फलंदाज संघात कायम असून गोलंदाजांमध्ये आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज कायम आहेत.

उमेश यादव घेणार शार्दुल ठाकूरची जागा

उमेश यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. पण आता तो दुखापतीतून सावरला आहे. तरी त्याची तंदुरुस्ती चाचणी झाल्यानंतर तो देखील भारतीय संघात अहमदाबाद कसोटींसाठी सामील होईल. तो शार्दुल ठाकूरची जागा घेईल. शार्दुलला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुक्त करण्यात आले आहे.

पाच नेट गोलंदाजांचा समावेश
बीसीसीआयच्या निवड समीतीने ५ नेट गोलंदाज आणि २ राखील खेळाडूंचीही निवड केली आहे. नेट गोलंदाजांमध्ये अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम आणि सौरभ कुमार यांचा समावेश आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये केएस भरत आणि राहुल चाहरचा समावेश आहे.

याशिवाय अभिमन्यू इश्वरन, शाहबाज नदीम आणि प्रियांक पांचाल यांना २० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी मुक्त करण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर तिसरा आणि चौथा कसोटी सामना 
अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि चौथा कसोटी सामना होणार आहे. तिसरा सामना दिवस- रात्र कसोटी सामना असून हा सामना २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा सामना ४ मार्चपासून सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रेयस अय्यरचा संघ लिलावात देणार सगळ्यांना टक्कर, आखून ठेवलीय ‘खास’ रणनिती

आयपीएल लिलावापुर्वी ‘थाला’प्रेमींच्या अपेक्षांचा चुराडा, १२ वर्षांत पहिल्यांदाच मोडणार सीएसकेची परंपरा

इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूची आयपीएल लिलावातून माघार, रोहितच्या संघाने ओतला असता बक्कळ पैसा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---