कोलकाता । येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात श्रीलंकन गोलंदाजांना भारतीय संघाला बाद करण्यात यश आले.
भारताकडून चेतेश्वर पुजारा (५२), वृद्धिमान सहा (२९), मोहम्मद शमी (२४) आणि रवींद्र जडेजा (२२) यांनी थोडाफार प्रतिकार केला. श्रीलंकेकडून सुरंगा लकमल (४), लिहूरू गामागे (२), दशुन शनका(२) आणि दिलरुवान परेरा (२) यांनी विकेट्स घेतल्या.
सध्यास्थितीत श्रीलंका संघ १ बाद ३० धावांवर खेळत आहे.