---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडीयाची घोषणा, रोहीतकडे कर्णधारपद

On: रविवार, फेब्रुवारी 25, 2018 12:32 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात श्रीलंकेमध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात टी २०ची तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. 

यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने या दौऱ्यात विश्रांतीची मागणी केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू सातत्याने खेळत असल्यामुळेच ही विश्रांती देण्यात आली आहे. यात भारताचा कर्णधार विराट कोहली, एम एस धोनी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दीक पंड्या आणि जसप्रीत बुमराह  या खेळाडूंचा सामावेश आहे.

संघ- रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहूल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), दिपक हूडा, वाॅशीगंटन सुंदर, य़ुझवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दल ठाकूर, जयदेव उनाडकत, मोहंमद सीराज, रीषभ पंत (यष्टीरक्षक)

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment