कसोटी क्रिकेट हे सर्व क्रिकेट स्वरूपांपैकी सर्वात अवघड मानले जाते. आणखी एक गोष्ट अशी की कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात ९० षटके मैदानावर राहण्यासाठी एका खेळाडूला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट असावे लागते.
वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये खूप वेळा गोलंदाजी करताना दिसतात, तर दुसरीकडे फलंदाजांनाही मैदानावर खूप वेळा पर्यंत फलंदाजी करायला आवडते. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ यात खूप फरक आहे. पूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज दिवसभर क्रीझवर फलंदाजी करत असायचा पण आता ते फारच क्वचित बघायला मिळतं.
कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकाला चेंडू सतत पकडावे लागते हेही खूप अवघड असते. या सर्व प्रकारानंतरही खेळाडू कसोटी क्रिकेटकडे अधिक लक्ष देऊन त्याचा आनंद घेतात. गेल्या अनेक वर्षांत भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे.
उत्तम क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज व्यतिरिक्त संघ फलंदाजीमध्येही मजबूत आहे. भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. यामुळेच जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या लेखामध्ये भारतीय संघातील तीन खेळाडूंचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांनी सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळले आहेत.
सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
३. गुंडप्पा विश्वनाथ
गुंडप्पा विश्वनाथ यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण ९१ कसोटी सामने खेळले, परंतु त्यापैकी ८७ सामने त्यांनी सलग खेळले. हे सामने १९ मार्च १९७१ ते ३० जानेवारी १९८३ या काळात त्यांनी खेळले आहेत. या सामन्यांत त्यांनी ५ हजार ७०० हून अधिक धावा केल्या आणि ३३ अर्धशतकांव्यतिरिक्त १३ शतकेही केली.
ते स्क्वेअर कट खेळण्यात हुशार होते. गुंडप्पा विश्वनाथ यांना चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळायला मजा यायची. या काळात सतत खेळल्यानंतर जेव्हा त्यांना संघातून वगळण्यात आले, तेव्हा भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यात त्यांना यश आले नाही.
२. राहुल द्रविड
भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणार्या ‘द वॉल’ राहुल द्रविड देखील सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहे. १९९६ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर २००५ पर्यंत त्याने सलग ९३ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी द्रविडने ८ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात त्याने २० शतके आणि ३९ अर्धशतकेही केली आहेत. भारतीय संघातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांमध्ये राहुल द्रविडचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण १६४ कसोटी सामने खेळले असून १३ हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
१. सुनील गावसकर
‘लिटल मास्टर’ म्हणून ओळखल्या जाणार्या सुनील गावसकर यांनी सर्वाधिक सलग कसोटी सामने भारतासाठी खेळले आहेत. सुनील गावस्कर यांनी जानेवारी १९७५ ते फेब्रुवारी १९८७ पर्यंत सलग १०६ कसोटी सामने खेळले. या सामन्यांत त्यांनी ८ हजार ५०० हून अधिक धावा केल्या आहेत आणि २९ शतके ठोकली आहेत.
सुनील गावस्कर कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे खेळाडूही आहेत. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण १२५ कसोटी सामने खेळले आहेत.
ट्रेंडिंग लेख –
पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती
वाढदिवस विशेष- ४९ वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ५: लक्ष्मणची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळी
महत्त्वाच्या बातम्या –
आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, ४ वर्षांनी दिग्गज खेळाडू करतोय कमबॅक
ICC वर्ल्ड कप सुपरलीग: फ्रंटफूट नोबॉलवर असणार थर्ड अंपायरची करडी नजर, पहा आयसीसीचे नवे नियम