आयपीएल २०२२ मध्ये कित्येक भारतीय गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. याच यादीतील एक नाव आहे, गुजरात टायटन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत उमदा गोलंदाजी केली आहे. शमीच्या गोलंदाजीवर माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफ प्रभावित झाला असून त्याने त्याच्या गोलंदाजीची तोंडभरून स्तुती केली आहे.
शमीने (Mohammad Shami) या आयपीएल हंगामातील आपल्या सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये ६.८८ च्या इकोनॉमी रेटने ५ विकेट्स घेतल्या आहेत. तो नव्या चेंडूने खतरनाक गोलंदाजी करताना दिसत आहे. गुजरात टायटन्सच्या (Gujrat Titans) पहिल्या सामन्यात तो लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध सामनावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला होता.
स्पोर्ट्सकीडाच्या ‘एसके मॅच की बात’ या कार्यक्रमात कैफने (Mohammad Kaif) शमीच्या नव्या चेंडूने मिळवलेल्या यशामागचे गुपित सांगितले आहे. तो म्हणाला की, “युवा गोलंदाजांनी शमीकडून शिकायला पाहिजे. शमी कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये एक सारखीच गोलंदाजी करतो. त्याची सीम पोजिशन शानदार आहे आणि त्याचे मनगट बरोबर चेंडूच्या मागे असते, त्यामुळे चेंडू योग्य जागेवर पडण्यास मदत मिळते.”
पुढे कैफला नव्या चेंडूने खतरनाक गोलंदाज म्हणाताना कैफ (Mohammad Kaif On Mohammad Shami) म्हणाला की, “जेव्हा चेंडू सीमवर पडतो, तेव्हा हालचाल होते आणि हीच शमीची ताकद आहे. नव्या चेंडूसोबत क्रिकेटविश्वात त्याच्याइतका खतरनाक गोलंदाज दुसरा कोणीच नाहीये, हे सर्वांना मान्य करावे लागेल.”
हेही वाचा- राडाच ना! आवेश खानने केली बुमराह अन् शमीलाही न जमलेली कामगिरी; ‘या’ खास यादीत नोंदवले नाव
मुंबई इंडियन्सबद्दल कैफ म्हणाला की…
कैफचे म्हणणे आहे की, “कोणत्याही संघाला पावर हिटरऐवजी मजबूत गोलंदाजी आक्रमणावर लक्ष द्यायला हवे, याचे गुजरात संघ सर्वात चांगले उदाहरण आहे. मात्र ५ वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने यंदा त्यांच्या गोलंदाजी फळीला मजबूत बनवण्यावर लक्ष दिलेले नाही. कदाचित याच कारणामुळे मुंबईचा संघ आतापर्यंत ३ सामने खेळूनही विजयापासून दूर आहे.”
कैफ म्हणाला की, “गुजरातची ताकद त्यांची गोलंदाजी आहे. मुंबई संघाला आता वाटत असेल की, एक मजबूत गोलंदाजी आक्रमणाचा प्रभाव काय असू शकतो. लॉकी फर्ग्युसन मागच्या सामन्यात सामनावीर होता आणि शमी पहिल्या सामन्यात सामनावीर होता. गुजरातने त्यांचे दोन्हीही सामने गोलंदाजांमुळे जिंकले आहेत. यावरून इतके लक्षात येते की, गोलंदाजही सामना पालटू शकतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०१३मध्ये परदेशी खेळाडूमुळे गेला असता चहलचा जीव, बाल्कनीत नेऊन केले होते ‘हे’ कृत्य
मयंकच्या थंडावलेल्या बॅटमधून दिग्गजाला गुजरातविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा; म्हणाला, ‘आता वेळ आलीय…’