---Advertisement---

रिषभच्या दमदार फॉर्ममुळे ‘या’ यष्टीरक्षकांची कारकिर्द संकटात, टीम इंडियाचे दरवाजे होणार बंद!

---Advertisement---

दिल्लीचा 23 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गेल्या काही दिवसांत आपल्या शानदार फलंदाजीने सर्व क्रिकेट तज्ञांच्या मनावरती अधिराज्य गाजवले आहे. डिसेंबर-जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान रिषभ पंतने शानदार फलंदाजी करत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.

यानंतर या नवोदित यष्टीरक्षक फलंदाजाची ही शानदार कामगिरी पाहता, इंग्लंडविरुद्धच्या घरेलू कसोटी मालिकेत, त्यानंतर टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही जागा कायम राहिली होती. म्हणूनच त्याची सर्वोत्कृष कामगिरी येणाऱ्या काळात काही यष्टीरक्षक फलंदाजांचा मार्ग बंद करणार असल्याचे दिसत आहे. तर आज आपण अशा 3 यष्टीरक्षक फलंदाजांविषयी चर्चा करणार आहोत, ज्यांच्यासाठी रिषभ पंतमुळे भारतीय संघाचे दरवाजे पुढील काही काळ बंद होऊ शकतात.

1. संजू सॅमसन
केरळचा 26 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने 2015 मध्येच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द सुरू केली होती. पण 5 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सॅमसनने फक्त 7 सामने खेळले आहेत आणि या सामन्यांमध्ये त्याची कामगिरीसुद्धा काही चांगली राहिली नाही. डिसेंबर-जानेवारीत ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यातील मर्यादित षटकांच्या मालिकेतही सॅमसन अपयशी ठरला. त्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात रिषभ पंतमुळे संजू सॅमसनच्या उर्वरित आशादेखील संपुष्टात येणार असल्याचे दिसत आहे.

2. श्रीकर भरत
विशाखापट्टणमच्या श्रीकर भरत या 27 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने 2013 मध्ये आंध्र प्रदेश संघाकडून घरगुती क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 8 वर्षाच्या घरगुती क्रिकेट कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 78 प्रथम श्रेणी, 51 अ दर्जाच्या आणि 48 टी -20 सामने खेळले आहेत.

या सामन्यात या अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजाने फलंदाजीमध्ये आणि यष्टीमागे दोन्हीतही चांगली कामगिरी केली. श्रीकर भरतने फलंदाजीमध्ये प्रथम श्रेणीत 37.24 च्या सरासरीने 4283 धावा, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 28.14 च्या सरासरीने 1351 धावा आणि देशांतर्गत टी२०त 17. 80 च्या सरासरीने 730 धावा केल्या आहेत. पण अलिकडच्या काळात रिषभ पंतच्या चमकदार खेळीने त्याचा भारतीय संघातील मार्ग कठीण झाला आहे.

3. ईशान किशन
झारखंडचा 22 वर्षीय युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने वयाच्या 14 व्या वर्षीच 2014 मध्ये झारखंडसाठी आपल्या घरगुती क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर जवळपास 7 वर्षांच्या घरगुती कारकीर्दीत इशानने 44 प्रथम श्रेणीतील 77 अ गटातील आणि 97 घरगुती टी -10 सामने खेळले आहेत.

या सामन्यांमध्ये ईशानने प्रत्येक क्रिकेटच्या स्वरूपात सरासरीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने अवघ्या 32 चेंडूत 56 धावांची शानदार खेळी केली. भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ईशान किशनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. परंतु रिषभ पंतचा सध्याचा उत्कृष्ट फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील फॉर्म पाहता ईशान किशनचे पुनरागमन करणे अत्यंत कठिण वाटत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बायो बबलचा असाही फायदा; रोहित-विराटमधील नातेसंबंधात सुधार होत झाले एकमत!

भर सामन्यात शार्दुलचे अश्लील कृत्य, इंग्लिश फलंदाजांना दाखवलं मधले बोट; चाहत्यांनी केलं ट्रोल

अरेच्च्या! काँग्रेस प्रवक्त्याचा भारतीय दिग्गजासोबत विमान प्रवास, शेजारी बसूनही नाही ओळखलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---